Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १४

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:39 IST)
 
तो मजकूर राजाने ऐकिल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंदरास आणविले व एक मोठी खाच खणून तीत त्यास लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकिली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जिवे मारून टाकिन, अशी त्या वेळेस हजर असणारांना सक्त ताकीद दिली.
 
राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणिली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाहि समजली नाही. दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली. तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली, तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला, हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले. पण राजांना परमानंद झाला आणि गावकर्‍यास त्या साधूचे दर्शन अंतरले.
 
जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली, ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले.

सर्व पहा

Sabudana Rasmalai श्रावण उपवासात बनवा शाही मिठाईसारखी साबुदाणा रसमलाई

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

श्रावण महिन्यात शनिवारी 'पारंपरिक कढी-खिचडी' बनवण्याची सुंदर परंपरा

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

Sampat Shanivar Katha संपत शनिवारची कहाणी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments