Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १७

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:51 IST)
 
असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता, मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी, फावडी त्यांना मारावयास उगारिल्या. ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली; तिनेहि तसेच सांगितले. मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरूने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर आंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला. राजास बोलवावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा, जालंदर व प्रधानादि लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले.
 
राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदिकरून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले. नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसहवर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.

सर्व पहा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments