Dharma Sangrah

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३६

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:59 IST)
 
ती देववाणी ऐकतांच कोशधर्मानें त्या मुलास उचलून घरीं नेलें. त्या समयीं त्यास परमानंद झाला. तें ऐकून त्याची स्त्री सुरादेवी हीदेखील समग्र झाली. ती म्हणाली, मला वाटतें कीं, हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा. तिनें मुलास उचलून स्तनाशीं लाविलें तो पान्हा फुटला. मग तिनें आनंदानें मुलास स्नान घालून पाळण्यांत घातलें व त्याचें ' वटसिध्द नागनाथ ' असें नांव ठिविलें. सुरादेवींचें त्या मुलावर अत्यंत प्रेम जडलें. तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्मानें सातव्या वर्षा त्याचें यथाविधि मौंजीबंधन केले.
 
एके दिवशीं दोन प्रहरीं वटसिध्द नागनाथ भागिरथीच्या तीरीं काशीविश्वेश्वराच्या समोर कांहीं मुलें जमवून खेळूं लागला त्या संधीस दत्तात्रेयाची स्वारी तेथें गेली व मुलांचा खेळ पाहूं लागली. तेथें मुलांच्या पंक्ति बसवुन त्यांस वटसिद्ध नागनाथ लटकेंच अन्न वाढीत होता, मुलें पुरें म्हणत होती. हा त्यांस घ्या, घ्या म्हणून आग्रह करुन वाढीत होता. असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रेयानें पाहिला. तेव्हां त्यास आश्चर्य वाटलें. लटक्यांच अन्नानें पोट भरलें म्हणून मुलें म्हणत, हें ऐकून त्यास हसुं आलें. नंतर बालरूप धरुण दत्तात्रेयानें त्या मुलांत संचार केला व अंगणांत उभा राहून तो म्हणाला, मी अथीत आलों आहें, मला भूक फार लागली आहे. कांहीं खावयास अन्न वाढा. हें ऐकून तीं मुलें त्याच्या पाठीस लागली व म्हणाली, तु रे कोण आमच्या मडळींत खेळावयास आला आहेस ? जातोस कां मारूं तुला ? असें म्हणुन कांहीं मुले काठीं उगारूं लागली व कांहीं मुलें दगड मारावयास धावलीं. हें नागनाथानें पाहिलें तेव्हां तो सर्व मुलांस म्हणाला आपल्या मेळ्यांत जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊं नका, आपल्याप्रमाणे त्यासहि वाढूं आयत्या वेळीं आलेल्या ब्राह्मणास अथीत समजुन परत दवडू नये, असे बोलुन त्याने त्या मुलास बसविलें. मग कल्पननें स्नान, षोडशोप चारांनीं पूजा, भोजन वगैरे झाले. जेवतांना सावकाश जेवा, घाई करुं नका. जें लागेल तें मागून घ्या, असा त्यस तो आग्रह करीत होताच. तेव्हा हा उदार आहे असें दत्तात्रेयास वाटले. हा पूर्वीचा कोणी तरी योगी असावा असेंहि त्याच्या मनांत ठसलें. दुसर्‍यास संतोशवून त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणें पूर्वपुण्याईवांचुन घडावयाचें नाहीं, असा मनांत विचार करुन तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधूं लागला. तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रेयाच्या लक्षांत आला. मग दत्तात्रयानें त्यास कृपा करुन सिद्धि दिली. तिचा गुण असा झाला कीं नागनाथ ज्या पदार्थाचें नांव तोंडांतुन घेई, तो पदार्थ तेथें उत्पन्न होऊं लागला. नंतर मुलांना जेवावयास वाढ म्हणून दत्तात्रेयानें नागनाथास सांगितलें. पण त्या सिद्धिचें अन्न खाण्याची नागनाथानें फक्त मनाई केली होती. जातेसमयीं दत्तात्रेयानें आपलें नांव सांगुन त्याचें नांव विचारुन घेतलें.
 
मग खेळतांना नागनाथ ज्या पदार्थाचे नांव घेई तो पदार्थ उप्तन्न होऊं लागला. त्यामुळें मुलें नित्य तृप्त होऊन घरीं बरोबर जेवीनातशीं झालीं न जेवण्याचें कारण आईबापांनीं मुलांना घरीं विचारलें असतां आम्हीं षड्रस अन्न जेवून येतो; म्हणुन मुलांनी सागांवे. प्रथम ही गोष्ट आईबापांना खरीं वाटली नाहीं; पण त्यांनी स्वतः भागीतथीतीरीं जाऊन नागनाथ षड्रस अन्नें वाढतो हें पाहतांच त्यांची खात्री झाली. मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती कानांवर गेली. कित्येकांनी त्यास सांगितलें कीं, भागीरथीच्यां कांठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ति बसवुन उत्तम उत्तम पक्वाअन्नांच्या जेवणावळी घालीत असतो. हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलों आहों. तो अन्न कोठून आणितो व कसें तयार करितो त्याचें त्यासच ठाऊक. त्यानें जमिनीवर हात ठेविला कीं, इच्छिला पदार्थ उप्तन्न होतो. ही बातमी कोशधर्मानें जेव्हां ऐकिली, तेव्हां तो पूर्वी देवांनीं सांगितलेली खून समजला. पण त्यानें लोकांस ती हकिकत बोलून दाखविली नाहीं.
 
पुढें एके दिवशीं कोशधर्मानें आपल्या वतसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरुन हात फिरवित व मुलाच्या जेवणांसंबधीं गोष्ट काढिली. तेव्हा तो म्हणाला, तुम्हांसहि मी असाच चमत्कार दाखवुन भोजनास घालितो. असें म्हणुन तो मांडीवरुन उतरला व जमिनीवर हात ठेवुन षड्रस अन्नाची इच्छा प्रकट करतांच उत्तम उत्तम पदार्थानीं भरलेलें पान तेथें उप्तन्न झालें तें पाहून कोशधर्मास फारच नवल वाटलें. मग हें साधन तुला कसें साध्य झालें. असें बापानें विचारल्यावर तो म्हणाला बाबा ! आम्हीं एकदां पुष्कळ मुलें नदीतीरीं खेळत होतो. इतक्यांत दत्तात्रेय नांवाचा मुलगा आला. त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याचा पदर्थानें मनोभावें पूजा केली. तेव्हां त्यानें माझ्या मस्तकावर हात ठेवून कानांत कांहीं मंत्र सांगितला व अन्न वाढावयास लाविलें. त्या दिवसापासून माझ्या हातुन पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो. हें ऐकुअन बापास परमानंद झाला. मग तो त्या दिवसापासुन मुलाकडून अथीताभ्यागतांची पुजा करवून त्यांस भोजन घालुन पाठवू लागला. त्यानें दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य, वस्त्र , धान्ये वगैरे घेऊन जाऊं लागली. या योगानें तो जगविख्यात झाला. जो तो त्याची कीर्ति वाखाणूं लागला.
 
एके दिवशीं नागनाथानें बापास विचारलें कीं , माझ्या हातानें या गोष्टी घडतात यांतला मुख्य उद्देश कोणता ? तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता, हें मला खुलासा करुन सांगावें तेव्हां बाप म्हणाला तो द्त्तात्रेय तिन्हीं देवांचा अवतार होय. तुझे दैव्य चांगले म्हणून तुला भेटुन तो सिद्धि देऊन गेला. तें ऐकून पुनः त्यावर बाप म्हणाला , तो एके ठीकाणी निसतो; यामुळें त्याची भेट होणें कठीण होय. त्याच्या भेटीची इच्छा धरुन प्रयत्‍न चालविल्यानें भेट होते असें नाहीं. तो आपण होऊन कृपा करुन दर्शन देईल तेव्हां खरें असें सांगुन बाप कांहीं कामाकरितां घराबाहेर गेला.
 
मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायाचा नागनाथानें निश्चय केला. तो कोणास न विचारतां घरुन निघाला व मातापुरी, पांचाळेश्वर वगैरे ठिकाणीं शोध करुं लागला. परंतु तेथें पत्ता न लागल्यामुळें कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयीं चौकशीं करुं लागला . तेव्हा लोक त्यास समजुन हंसले व दत्तात्रेय येथें येतो पण कोणास दिसत नाहीं कोणत्या तरी रुपानें येऊन भिक्षा मागूण जातो असें त्यांनी सांगितले. तें ऐकून दुसर्‍या क्षेत्रांत त्यास भिक्षा मिळत नाहीं कीं काय असें नागनाथानें विचारिलें या नाथाच्या प्रश्नावर लोकांनीं उत्तर दिलें कीं तो या कोल्हापुराशिवाय दुसर्‍या ठिकाणचें अन्न सेवन करीत नाहीं. येथें अन्न न मिळालें तर तो उपवास करील, पण अन्नासाठी दुसर्‍या गांवीं जाणार नाहीं. अन्य गांवच्या पक्वांन्नांस विटाळाप्रमाणें मानून या गांवांत अन्न परम पवित्र असं तो मानितो.
 
मग वटसिद्ध नागनाथानें विचार केला कीं, गांवांत कोठेंहि स्वयंपाक होऊं न देतां सर्वांस येथेंच भोजनास बोलवावें म्हणजे त्यास तिकडे कोठें अन्न मिळणार नाहीं व सहजच तो आपल्याकडे येईल. परंतु आपल्याकडचें सिद्ध अन्न तो घेणार नाही, ही खून लक्षांत ठेवुन ओळख पटतांच त्याचें पाय धरावे. माझें नांव त्यास व त्याचें नांव मला ठाऊक आहे, असा मनांत विचार करुन तो लक्ष्मीच्या देवालयांत गेला व पुजार्‍यापासुन एक खोली मागून घेऊन तेथें राहिला.
 
कांहीं दिवस गेल्यावर गांवजेवणावळ घालावी असें नाथाच्या मनांत आलें त्यानें ही गोष्ट पुजार्‍याच्यापाशीं काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली. तेव्हां पुजारी म्हणाला, सार्‍या गावाच्या समाराधनेस पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवला कोठें आहे? एरव्हीं वरकड सर्व खटपट आम्हीं करुं पण सामान कोठून आणणार ? त्यावर नाथानें सांगितलें कीं, सामग्री मी पुरवितो, तुम्ही खटपट मात्र करुं लागा. तें त्याचें म्हणणें पुजार्‍यानें कबूल केलें. शेवटीं नाथानें द्रव्य, धान्यें, तेल, साखर वगैरे सर्व सामुग्री सिद्धीच्या योगानें चिकार भरुन ठेविली व पुजार्‍यास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली.

सर्व पहा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

स्वामी समर्थांची लीला: जेव्हा भक्ताच्या झोळीतील हाडं झाले सोन्याचे!

संतान गोपाळ स्तोत्रम् : संततीसाठी भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी दररोज करा या पवित्र स्तोत्राचे पठण

दररोज म्हणा सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रम्, माता दुर्गेची कृपा आणि सुख-समृद्धी मिळवा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments