Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Swami Samarth Prakat Din 2026 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?

Updated: शुक्रवार, 20 मार्च 2026 (07:54 IST)
 
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचे नामस्मरण, मंत्र, जप, स्त्रोतांचे पठण किंवा श्रवण करावे. तसेच या दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत, स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह पद्धतीने पारायण करावे.
ALSO READ: श्री स्वामी चरित्र सारामृत १ ते २१ अध्याय
माहिती
स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाल्याचे समजले जाते. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. इ.स. १४५९ मध्ये, माघ वद्य १, शके १३८० या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापूरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले होते. दरम्यान एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत होता तेव्हा त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. हे निमित्त् समजा कारण स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तेच होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज.
 
आपल्या हातून महापुरुषाला जखम झालेली बघून उद्धवाला दुःख झाले तसेच त्याला भय देखील वाटू लागले. पण महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करत ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
ALSO READ: स्वामी समर्थ आरती Swami Samarth Aarti
अवतार कार्य समाप्ती
श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्नकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केल्याचे भासवले. श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले. स्वामींनी इसवी सन १८७८ मध्ये त्यांचे अवतार कार्य संपले असले तरी स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करतात.

सर्व पहा

Hartalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी? जाणून घ्या शुभ रंग आणि त्यामागचं महत्त्व आणि कारण

Sant Sena Maharaj Aarti in Marathi संत सेना महाराज आरती

Happy Bail Pola Images बैलपोळ्याच्या शुभेच्छा स्टेटस

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Hartalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे ५ काम, जाणून घ्या धार्मिक मान्यता

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments