Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओहायोमध्ये तिसऱ्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याचा मृत्यू

Updated: शनिवार, 3 फेब्रुवारी 2024 (10:11 IST)
 
न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले. या घटनेत कोणत्याही प्रकारचा संशय असण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. ओहायो येथील भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगेरी याच्या दुर्दैवी निधनाने दु:ख झाल्याचे वाणिज्य दूतावासाने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
याघटनेबाबत अधिक माहिती न देता वाणिज्य दूतावासाने सांगितले की, आम्ही कुटुंबाच्या सतत संपर्कात आहोत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहोत. बेनिगेरी यांच्या भारतातील कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचे वडील लवकरच भारतातून अमेरिकेत येतील, अशी अपेक्षा आहे.
 
या आठवड्याच्या सुरुवातीला पर्ड्यू विद्यापीठाचे विद्यार्थी नील आचार्य सोमवारी मृतावस्थेत आढळले होते. आचार्य रविवारपासून बेपत्ता होते. काही तासांनंतर, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एक मृतदेह आढळून आला आणि त्याची ओळख आचार्य म्हणून झाली.

दुसऱ्या प्रकरणात, हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी विवेक सैनी याला १६ जानेवारीला जॉर्जियातील लिथोनिया येथे एका बेघर माणसाने बेदम मारहाण केली. विवेक जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये एमबीए करत होता.

यापूर्वी, अकुल धवन हा आणखी एक भारतीय विद्यार्थी जानेवारीत इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन (UIUC) विद्यापीठाबाहेर मृतावस्थेत आढळला होता. 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टममध्ये त्याचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments