suvichar

'बाबा का ढाबा' पुन्हा रस्त्याच्या कडेला, रेस्टॉरंट पडलं बंद

Updated: बुधवार, 9 जून 2021 (13:03 IST)
 
माध्यमांशी बोलताना बाबा कांता प्रसाद म्हणाले की, रेस्टॉरंटचा खर्च एक लाख रुपयांपेक्षा जास्त होता आणि उत्पन्न-35- 40 हजार रुपये होते. यामुळे रेस्टॉरंट बंद करावं लागलं. कांता प्रसाद यांनी सांगितले की रेस्टॉरंटचे भाडे 35 हजार आहे, कुक आणि इतर कर्मचार्‍यांचा खर्च 36 हजार आहे आणि वीज आणि पाण्याचे बिल एकत्र करुन सुमारे एक लाखाहून अधिक आहे. उत्पन्न कधी- कधी 40 ते 45 हजार रुपये मिळत असल्याने निर्णय घ्यावा लागला.
 
बाबांचे मॅनेजर आणि वकील कोठे गेले विचारल्‍यावर बाबा म्हणाले की प्रत्येकजण निघून गेला. सोशल मीडियावर आवाहन झाल्यानंतर लोक बाबांच्या मदतीसाठी पुढे आले आणि पैसे देऊनही मदत केली. त्या पैशांचे शेवटी काय झाले? यावर बाबा म्हणाले की यापूर्वी माझ्या खात्यात किती पैसे आहेत हे मला माहित नव्हते. 45 लाख रुपये असल्याचे वृत्तपत्रातून समजले. प्रथम ते 39 लाख आणि नंतर 45 लाख होते. माझे घर बांधले आणि काही पैसे खर्च झाले, आता माझ्याकडे फक्त 19 लाख रुपये शिल्लक आहेत.
गौरव वासन यांच्याशी मतभेद आहे का ? विचारल्‍यावर बाबा म्हणाले की नकळत काही चूक घडली परंतु गौरव वासन आम्हाला मदत केली त्याच्याविरूद्ध आम्ही तक्रार केली नाही. मागील वर्षी बाबांची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती.
 
यू-ट्यूबर गौरव वासनने त्यांचा व्हिडिओ तयार केला होता जो खूप व्हायरल झाला होता आणि दिल्लीतील लोकं त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते, मग बाबा का ढाबा प्रसिद्ध झाला होता. बाबा अर्थात कांता प्रसाद यांना मदत म्हणून खूप पैसे मिळाले. नंतर त्या पैशांसाठी त्यांचं गौरव वासन यांच्यासोबत वाद देखील निर्माण झाले, प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं होतं. आता एकदा पुन्हा बाबा आपल्या जुन्या जागेवर पोहचले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात सप्टेंबरपासून केमोथेरपी वॉर्ड सुरू होणार

अमरावतीत महाराष्ट्र बंदचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा शांततेत निघाला

२०३० पर्यंत महाराष्ट्राला क्रमांक १ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आढावा

महाराष्ट्रातील सर्व शाळांना तातडीने सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश

सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले, सरकारने तीन प्रमुख मागण्या मान्य केल्या

पुढील लेख
Show comments