Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पलंगावरची चादर बदलण्याची योग्य वेळ कोणती?

Updated: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (20:45 IST)
 
चादर बदलण्याची गरज काय आहे?
 
ब्राऊनिंग यांच्या मते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चादर बदलायला हवी
 
कारण स्वच्छता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला घाम येतो. सध्याच्या उकाड्याच्या दिवसात तर हा प्रश्न किती जटील आहे हे तुमच्या लक्षात येईल
 
चादर न बदलल्यामुळे घाम चादरीत जातो आणि त्याची भयानक दुर्गंधी येते असं ब्राऊनिंग सांगतात.
 
जेव्हा आपण झोपतो तेव्हा हवेशीर वातावरणाची गरज असते. तसंच फक्त घाम नाही तर झोपेत आपली डेड स्कीनही निघून जाते.
 
त्यामुळे चादर बदलली नाही तर चादर डेड स्कीन ने भरून जाईल.
 
ऐकायला भीषण वाटतं ना? आता पुढे ऐका. काही छोटे कीटक त्या मेलेल्या पेशी खातील आणि त्यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतं.
 
म्हणजे फक्त घामच नाही तर डेड स्कीन आणि कीटक तुमच्या झोपेच्या वेळी आसपास असतील
 
चादर बदलण्यासाठी ऋतू महत्त्वाचा असतो का?
 
याचं उत्तर हो असं आहे.
 
"थंडीच्या काळात चालू शकतं. पण तरीही आठवड्यातून एकदा बदलायलाच हवी असं ब्राऊनिंग सांगतात.
 
जर तुम्ही दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चादर बदलली नाही तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते.
 
थंडीत घाम येत नसला तरी डेड स्कीनचा विषय आहेच.
 
तसंच तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे हातही खराब होतात. कधी तुम्ही नीट तोंडही धुतलं नसतं, ब्राऊनिंग आठवण करून देतात.
 
या सर्वेक्षणात 18 टक्के लोकांनी सांगितलं की ते झोपण्याधी अंघोळ करतात. त्यामुळे त्यांना चादर बदलण्याची गरज भासत नाही.
 
"उन्हाळ्यात चादर बदलणं फार गरजेचं आहे कारण तिथे अलर्जी आणणारे जंतू येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
 
67 टक्के लोकांनी सांगितलं की ते विसरतात, 35 टक्के लोकांना काळजीच नसते. तर 22 टक्के लोकांकडे धुतलेली चादर नसते. चादर न बदलण्याचे हे मुख्य कारण लोकांनी सांगितलेले असतात. 38 टक्के लोकांना चादर बदलण्याची गरजच वाटत नाही. असं एका सर्वेक्षणात लक्षात आलं आहे.
 
ब्राऊनिंग म्हणतात झोपण्याचा बेड हे तुमचं साम्राज्य आहे. तिथे तुम्हाला छान, आनंदी वाटलं पाहिजे.
 
त्यांच्या काही क्लायंट्स ना निद्रानाशाचा वितकार आहे. त्या म्हणतात, "जर तुमची चादर धुतलेली नसेल, त्याचा वास येत असेल, त्यामुळे तुमची जागा ती नाही असाही विचार येणं स्वाभाविक आहे.
 
त्यामुळे आज झोपताना या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा. ते फार महत्त्वाचं आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ब्रिजभूषण सिंग यांच्या निर्दोष सुटकेमुळे विनेश नाराज, निर्णयाविरुद्ध अपील करणार

LIVE: सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही

सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी कोणती पिके आणि कामे प्राधान्याने करावीत?

पुढील लेख
Show comments