Marathi Biodata Maker

WHO गाइडलाइन: स्वयंपाक करण्याचे नियम

Updated: सोमवार, 18 मे 2020 (15:46 IST)
स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे टॉवेल, नॅपकिन व इतर कपडे देखील स्वच्छ ठेवायला हवे. 
हानिकारक जिवाणू या कापड्यांवर, भांडे ठेवण्याच्या जागी आणि भाजी चिरण्याच्या बोर्डावर चिटकून राहतात. या जागेची पण दररोज स्वच्छता करायला हवी.
शिजवलेल्या अन्न कच्च्या पदार्थांपासून लांब ठेवायला हवं. विशेषतः मासे, मीट सारख्या पदार्थांना थेट दुसऱ्या वस्तूंच्या संपर्कात येऊ देउ नये.
एका प्रकारांच्या खाद्य पदार्थ चिरल्यावर सूरी आणि कटिंग बोर्डला स्वच्छ करून घ्यावे. 
कच्च्या आणि शिजवलेले अन्न वेगवेगळ्या भांड्यात ठेवावे. दोन्ही भांडे संपर्कात तर नाही याची खात्री करून घ्यावी.
कच्चे अन्न जसे मीट, मासे, रस या पदार्थांमध्ये देखील जिवाणू असू शकतात. जे शिजवलेल्या अन्नात मिसळून त्याला देखील खराब करू शकतात. हे अन्न एका स्वस्थ माणसाने खाल्यावर तो सहजच आजारी पडू शकतो. 
कोणत्याही अन्नाला व्यवस्थित शिजवून घावे. ज्या अन्नाला शिजायला वेळ लागतो जसे की मीट, मासे, अंडी अशे पदार्थांना मंद आंचेवर शिजत पडू द्या. असे केल्याने त्यांच्या मधील असलेले सर्व जिवाणू नष्ट होतील. 
शिजवलेले अन्न खाण्याच्या आधी व्यवस्थित गरम करायला हवं.
शिजवलेल्या अन्नाला जास्त वेळ बाहेर राहू देऊ नये. जर अन्न पूर्ण संपत नसेल तर लगेच फ्रीजमध्ये ठेवा. आणि परत खाण्याच्या आधी ते गरम करूनच घ्या. शिजवलेल्या अन्नाला 2 तासांहून जास्त वेळ मोकळ्या हवेत सोडू नये.
अन्न शिजवताना वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 
शक्य असल्यास स्वयंपाकासाठी देखील RO पाण्याचा वापर करावा. 
कोणतीही भाजी शिजवण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ताज्या भाज्यांना प्राधान्य द्या.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात ५,००० नवीन लालपरी बसेस धावणार

मुंबईत अमित शाह यांची मोठी घोषणा, २०२९ पूर्वी २१ राज्यांमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू केली जाईल

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशव्यापी 'सेवा संकल्प अभियान'; अमित शाह यांची मुंबईत घोषणा

Maharashtra ST New Buses महाराष्ट्रात ५,००० नवीन लालपरी बसेस धावणार

Hindi Diwas 2026 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments