Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरें हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना पाठीशी घालत आहे म्हणत अमित शहा यांची घणाघात टीका

Updated: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (19:04 IST)
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे पक्ष आणि विरोधकांमधील शब्दयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी विरोधी महाविकास आघाडीवर (एमव्हीए) जोरदार टीका केली
 
सत्तेच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वे विसरल्याचा आरोप त्यांनी केला.धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा म्हणाले, “महायुती म्हणजे ‘विकास’ आणि आघाडी (महाविकास आघाडी) म्हणजे ‘विनाश’… तुम्ही ठरवायचे आहे की विकासाचा विध्वंस करणाऱ्यांना आणायचे आहे का?उद्धवजी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वे विसरत आहेत.
 
ते पुढे म्हणाले, “उद्धवबाबू, तुम्ही त्या लोकांसोबत बसलात ज्यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर करण्यास विरोध केला, राम मंदिर उभारणीला विरोध केला, तिहेरी तलाक हटवण्यास विरोध केला, कलम 370 हटवण्यास विरोध केला, तुम्ही हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यां सोबत बसला आहात.
 
विरोधकांवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले, “आघाडी (एमव्हीए) लोक इथल्या सर्व समुदायांचा विरोध करत आहेत. रामगिरी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केले. त्यांनी सिंदखेड्यात दंगल घडवली आणि अशा लोकांना प्रोत्साहन दिले जे महाराष्ट्र आणि देशासाठी चांगले नाही.”ते पुढे म्हणाले, “या देशातील लोक वक्फ कायद्यामुळे त्रस्त आहेत. 
 
अलीकडेच कर्नाटकातील वक्फ बोर्डाने गावे ही वक्फ मालमत्ता असल्याचा निर्णय घेतला. 400 वर्षे जुनी मंदिरे, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि लोकांची घरे वक्फ मालमत्ता झाली. वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही विधेयक आणले आहे, पण राहुल बाबा आणि पवार साहेब या विधेयकाला विरोध करत आहेत. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

भुताच्या अफवांमुळे अमरावतीत आश्रम शाळेतील ३०० विद्यार्थिनी घरी परतल्या; त्यांच्या गूढ वागण्यामुळे खळबळ उडाली

ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंवर एक्सपायरी डेट नाही? घाबरू नका, तुकाराम मुंडे यांनी सांगितले काय करावे

गणपती बाप्पा भक्तांसाठी रेल्वेची भेट! कोकण मार्गावर आणखी १६ विशेष गाड्या धावणार

नाशिकमध्ये पहाटे ३.४ तीव्रतेच भूकंप; घबराट पसरली

LIVE: शुक्रवारी सकाळी ५:३२ वाजता नाशिकमध्ये ३.४ तीव्रतेचा भूकंप

पुढील लेख
Show comments