Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rangana Fort रांगणा किल्ला

Updated: गुरूवार, 14 डिसेंबर 2023 (09:58 IST)
 
रांगणा! सह्याद्रीच्या मुख्य धारेशी लहान सोंडेनं जोडलेला असला तरी आकार विस्तीर्ण आहे. गडासमोरचा बुरूज भव्यतेमुळं लक्षवेधक आहे. बुरूजाच्या डाव बाजूनं वाट पुढं जाते. हा रस्ता डाव हातास खोल दरी आणि उजव हातास बुरूज असा आहे. रांगण्याचा  पहिला दरवाजा पडलेला असून काही अंतरावर दुसरा दरवाजा आहे. उजव्या बाजूस एक भिंत असून या भिंतीस असलेल्या लहान दरवाजतून प्रवेश केल्यानंतर निंबाळकर बावडी लागते. तटाजवळ आल्यानंतर एक चोर दरवाजा दिसतो. चांगल्या स्थितीत असलेल्या  तिसर्‍या दरवाजतून पुढे आल्यावर उजव्या हातास पाण्यानं भरगच्च तलाव व महादेवाचे भग्न मंदिर दिसतं. तलावाजवळ उजव्या बाजूस तटाच्या कडेला कोकण दरवाजा आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूस भग्न झालेले हनुमान मंदिर आहे. समोर दीपमाळ आणि डाव्या बाजूस बारव. तटाकडेनं चौथरे, मंदिरांचे अवशेष दिसतात.
 
सन 1658! सावंतवाडीचा लखम सावंत! होता तरी मराठी, पण शिवरायांच्या विरोधातच. विजापूरकरांचा सरदार रूस्तुम जमन यानं हा किल्ला लखम सावंताकडून घेतला खरा. पण त्यावर आदिलशाही निशाण लावण्याऐवजी 1666 मध्ये शिवरायांचा कोकणातील अधिकारी राहुजी पंडित याच्या स्वाधीन केला. त्यामुळं चिडलेल्या अदिलशाहानं रूस्तुम  जमान व त्याच्या सहकार्‍यांचा वध करण्याचा हुकूम दिला. पण रूस्तुम जमानच्या   दरबारातील सहानभूतीदारांनी अदिलशहास हा हुकूम रद्द करण्यास लावला. 14 एप्रिल ते 12 मे 1667 अदिलशाही सैन्यानं रांगण्यास वेढा घातला आणि आश्चर्य! अदिलशहातर्फे  लढण्यास व्यंकोची होता. शिवरायांचा सावत्र भाऊ. स्वत: शिवरायांनी येऊन हा वेढा मोडून काढला आणि गडावर आले. अदिलशहानं रांगण्याविरोधात उघडलेल्या मोहिमेबद्दल सभासद लिहितो की, ‘रांगणा किल्ला राजियांचा होता. त्यास विजापूरहून रूस्तुम जमान वजीर सात आठ हजार लष्कर घेऊन गडास वेढा घातला. ते वक्ती गडकरी यांनी थोर भांडण केले व राजियांनी लष्कर पाठवून उपराळा करून रूस्तुम जमान मारून चालविला. आणि गड राहिला. रूस्तुम जमान नामोहरम झाल्यावर बहलोलखान वजीर विजापूरहून बारा हजार जमाव स्वार घेऊन रांगणियासी वेढा घातला. गडकरी यांनी बहुत मारामारी केली. व राजियांनीही वाचवून पळून गेला. गड सुरक्षित राहिला.’ रांगणा किल्ल्यानं  स्वराज्याच्या कुलमुखतरांना जीवाभावानं साथ दिली. इ.स. 1700 मध्ये राजारामाचा मुक्काम रांगण्यावर होता. 1706 मध्ये राणी ताराबाई व त्यांच्या परिवाराला धरण्यासाठी  रांगणा घेण्याचा मोगलांचा प्रयत्न होता. औरंगजेबाने मराठय़ांचे अनेक किल्ले जिंकले. रांगण्याजवळचे सामाननगड, भूधरगड हेही घेतले. परंतु रांगण्यानं त्यास दाखवून दिलं की त्याच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेपेक्षा गडांची मजबूती अधिक आहे.
 
डॉ. नभा काकडे

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

मुंबई उच्च न्यायालयाने संजय दत्तच्या पुण्यातील 'बल्लर' या नाईटक्लबमध्ये परवाना नसलेल्या संगीतावर बंदी घातली

प्रियंका चोप्राने श्रीदेवीच्या जयंतीनिमित्त दिले सरप्राईज; 'एम्प्रेस' या त्यांच्या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ प्रदर्शित

लोकप्रिय गोपी बहू, जिया मानेक आता 'बिग बॉस २०' च्या घरात एन्ट्री करणार!

लोणावळा, माथेरान की भंडारदरा? पावसाळ्यात कोणतं ठिकाण बेस्ट, जाणून घ्या

६२ वर्षीय गोविंदा यांचे नाव नवीन सह-अभिनेत्री कोमल राणीसोबत जोडले

पुढील लेख
Show comments