Dharma Sangrah

Ramsej रामसेज का नाव पडलं ?

शुक्रवार, 24 मार्च 2023 (23:43 IST)
मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करणसाठी औरंगजेब प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये उतरला. नाशिक प्रांतात त्याचं वर्चस्व होतं. पण नाशिकजवळ असणारा रामसेज मात्र तस वाकुल दाखवत होता. रामसेज प्रचंड आणि उंच असा नाही, पण प्रचंड अशा मोगली सैन्याला या किल्ल्याने जवळपास सहा वर्षे झुंजवलं. रामसेजला वेढा घालून बसलेला सरदार शहाबुद्दीन खान याला यशच काय, यशाचा सदराही धरता आला नव्हता. हे यश मिळालं नाही, तर बादशहाकडं आपली अप्रतिष्ठा ठरलेलीच.‘रामसेज’वर हल्ला चढवाचा आणि आपल्या सैनिकांना दफन करायचं एवढंच काम त्यांच्याकडं उरलं होतं. अखेर त्याचा मोतदार त्याला म्हणाला, भुते वश करणकामी मी पटाईत आहे. शंभर तोळे वजनाचा एक सोनचा साप तयार करा. तो माझ्या हाती द्या आणि हल्ल्याच्या वेळी मला आघाडीवर ठेवा. मी भुतांच्या साहाय्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कोणतीही अडचण न येता जाऊ शकतो. खानानं त्याच्या म्हणणप्रमाणं केलं. तो मोतदार हल्ल्याच्या वेळी पुढे उभा राहिला. तेवढय़ात किल्ल्यावरून गोफणीचा गोळा येऊन त्याच्या छातीवर इतक्या जोरात लागला की मोतदाराच्या हातून सोन्याचा नाग उडाला आणि मोतदार धराशायी झाला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला. खूप प्रयत्न केले. पण रामसेजवरील मराठे त्याच्यासाठी अजय ठरले. औरंगजेबानं खानास वेढा उठवून परत येण्यास सांगितलं. अपमानित झालेला खान चिडला. तंबू सावरला. राम सेजवर आग ओकण्यासाठी म्हणून लावलेल्या तोफा शांत करून त्यांची तोंडंही वळवण्यात आली. किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी म्हणून खानानं लाकडाचा दमदमा उभारला होता. रागाच्या भरात खानानं तो पेटवून देण्याचा हुकूम केला. त्यात पेंढा आणि दारू भरून पेटवण्यात आला. प्रचंड जाळ झाला. रामसेजवरील मराठे तटावर उभं राहून पाहात होते. नगारे आणि चौघडे वाजवत ते हलकल्लोळ माजवत होते.
 
कसा होता रामसेजी? का नाव पडलं रामसेज असं? असं म्हणतात, श्रीराम वनवासात असताना काही दिवस त्यांच्या मुक्काम या डोंगरावर होता. त्यामुळंच हा डोंगर रामाची शय्या म्हणजे रामसेज म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या पायथ्याशी आशेवाडी नावाचं गाव. वाडीतून  कांही वेळातच राममंदिराजवळ येता येतं. इथं पाण्याची टाकी आहे. तुटलेल तटबंदीतून गडावर प्रवेश होतो. उजव बाजूस गडाचे ङ्कुख् प्रवेशद्वार आहे. तच सङ्कोर तटामधील खोलगट भागात खालच्या बाजूस चोरदरवाजा. गडावर उद्ध्वस्त चौथरे, गुहा आहेत.
 
शहाबुद्दीनच्या जागी औरंगजबाने कासिम खान किरमाणी या शूर सरदारास पाठवलं. परंतु कासिम खानानं परिश्रम करूनही गड अभेद्य राहिला. भीमसेन सक्सेना म्हणतो, अनेक गोष्टी केल्या पण रामसेजचा किल्लेदार सर्व मराठ्यांच्यात अत्यंत अनुभवी, कसलेला होता. त्याचे प्रयत्न आणि सावधगिरी यामुळे मोगली फौजेचे ही चालेना. गडात लोखंडी तोफा बनवल्या जात. त्यात ते कातडे भरवून तोफ्या उडवित. अशी एक एक तोफ दहा तोफ्यांचे काम करी.’सतत होणारा पराभव आणि सैनिकांचं होणारं नुकसान यामुळं हताश झालेल्या औरंगजेबानं वेढय़ाचं काम तहकूब केलं. रामसेजवरील लोकांचा पराक्रम पाहून छ. संभाजीराजांनी किल्लेदाराकडं मानाचा पोषाख, रत्नजडित कडे, रोख रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. त्याची आपल्या प्रमुख गडावर नेमणूक केली. संभाजीराजांनी गडावर अन्य किल्लेदाराची नेमणूक केली खरी. पण याच किल्लेदारानं सहा वर्षानी स्वराज्याशी बेईमानी करून हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला. परंतु रामसेजच्या काळजात असलेले आनंदाचे क्षण न झिरपता चिरंतन राहिले आहेत.
 
डॉ. नभा कापडे

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

बॉबी देओलने १५ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचे कौतुक करत म्हटले.....

तमिळ सुपरस्टार अजित कुमार यांच्या आईचे निधन झाले

परेश रावलने तीन दिवसांतच बँकेतील नोकरी सोडली, खर्चासाठी प्रेयसीकडून पैसे घ्यायचे

भूल भुलैया'मधील तरुण पंडिताचा लूक कसा साकारण्यात आला? राजपाल यादव यांनी सांगितले

Eight mysterious and haunted forts in India जिथे पर्यटक दिवसासुद्धा भेट देण्यास घाबरतात

पुढील लेख
Show comments