suvichar

गांधीजी जेव्हा महात्मा झाले...

वेबदुनिया
उत्तरांचलमध्ये असलेल्या हरिद्वारने गांधीजींना 'महात्मा' ही पदवी दिली. उत्तर प्रदेश माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित झालेल्या 'उत्तर प्रदेश' आणि डॉ. कृष्ण कुमारद्वारा संपादीत 'सहारनपुर संदर्भ' या पुस्तकानुसार स्वामी श्रद्धानंदजी यांनी सर्वप्रथम गांधीजींना 'महात्मा' या नावाने संबोधले. तेव्हापासून गाधीजींना महात्मा गांधी असे म्हटले जाऊ लागले.

गांधीजींना महात्मा ही पदवी 1915 मध्ये त्यांच्या हरिद्वार प्रवासादरम्यान गुरूकुल कांगडी येथे स्वामी श्रद्धानंद यांनी दिली होती. 8 एप्रिल 1915 रोजी गांधीजी गुरूकुल कांगडी येथे संत महंतांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी स्वामी श्रद्धानंद यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गांधीजींच्या कार्याची स्तुती करत स्वामींनी त्यांना महात्मा या पदवीने गौरविले होते.

1985 मध्ये प्रकाशित झालेल्या सहारनपूर संदर्भानुसार स्वामी श्रद्धानंद गांधीच्या सत्याग्रह आंदोलनाने प्रभावित झाले होते. गांधीजींना पाठिंबा देताना त्यांच्या आंदोलनाला धर्मयुद्धाची उपमा दिली होती. या धर्मयुद्धात आपणही सहभागी असल्याचे लिखित प्रतिज्ञापत्र त्यांनी गांधीजींना पाठवले होते. हरिद्वारचे गुरूकुल कांगडी स्वातंत्र्यसंग्रामाचे एक प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीशिवाय भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद सारख्या नेत्यांनीदेखील गुरूकुलामध्ये येऊन स्वातंत्र्य संग्रामाची रणनीती आखली होती.

' उत्तर प्रदेश' या पुस्तकात गांधीचे प्रमुख गांधीवादी लेखक रामनाथ सुमन आहेत. या पुस्तकात गांधींचा हरिद्वार प्रवास आणि गुरूकुल भ्रमणाचा उल्लेख आहे.

याशिवाय 1933 मध्ये सत्यदेव विद्यालंकारद्वारा प्रकाशित 'स्वामी श्रद्धानंद' या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 372 वर स्वामीजींनी पहिल्यांदा गांधीजींना महात्मा म्हणून पुकारल्याचा उल्लेख आहे. गांधीजींनी आत्मचरित्रात स्वत: लिहले होते की स्वातंत्र्य आंदोलनात काय करावे किंवा भविष्यात कोणती रणनीती आखावी याची प्रेरणा त्यांना हरिद्वार येथे 1915 मध्ये आयोजित एका कुंभमेळ्याप्रसंगी संत-महंतांकडून मिळाली होती.

एवढेच नाही तर दिवसातून केवळ पाच पदार्थांचे सेवन करण्याचा संकल्प त्यांनी हरिद्वार येथे केला होता. कुंभमेळ्यातील उपवासादरम्यान हा संकल्प केला होता. यामध्ये पाण्याचा समावेश नव्हता. तेव्हा स्वामी श्रद्धानंदाने महात्मा गांधी एक महान पुरूष बनतील अशी भविष्यवाणी केली होती.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

विद्यार्थ्यांना मोठा धक्का, महाराष्ट्रासह देशभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालये बंद झाली

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे भूस्खलन; रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आणि मार्ग बदलले

मुंबईत आज सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; शाळा आणि महाविद्यालये बंद, बीएमसीकडून सूचना जारी

अमरावती जिल्ह्यात धारणीमध्ये बैलगाडीवर विजेचा खांब कोसळून शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments