Marathi Biodata Maker

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

Updated: गुरूवार, 23 जुलै 2026 (21:41 IST)
 
२. प्रमुख जाती
पिवळ्या रंगाच्या: राजा, इंदिरा, अप्सरा, चंद्रा.
पांढऱ्या रंगाच्या: कस्तुरी, पांढरी रेवडी, बर्फी.
लाल/गुलाबी रंगाच्या: लालपरी, शामल, नीलिमा.
 
३. पूर्वमशागत आणि लागवड
पूर्वमशागत: जमीन १-२ वेळा उभी-आडवी नांगरून घ्यावी. प्रति एकर १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे.
 
गादीवाफे : जमिनीचा चांगला निचरा होण्यासाठी गादीवाफे तयार करावेत.
 
लागवडीची वेळ: जून ते जुलै (पावसाळ्यात) किंवा ऑगस्ट महिन्यात लागवड करणे सर्वात उत्तम मानले जाते.
 
अंतर: दोन रोपांमध्ये ३० सेमी × ३० सेमी किंवा ४५ सेमी × ३० सेमी अंतर ठेवावे.
 
४. खत आणि पाणी व्यवस्थापन
पाणी: लागवडीनंतर लगेचच हलके पाणी द्यावे. पावसाळ्यात गरजेनुसार, तर हिवाळ्यात ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 
खत व्यवस्थापन: 
लागवडीच्या वेळी: नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) योग्य प्रमाणात द्यावे.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी: पुन्हा हलका नत्राचा (Urea) हप्ता द्यावा.
 
५. महत्त्वाच्या कृती
शेंडा खुडणे : लागवडीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी झाडाचा मुख्य शेंडा खुडावा. यामुळे झाडाला अधिक फांद्या फुटतात आणि फुलांचे उत्पादन वाढते.
आधार देणे: झाडाला खूप फुले आल्यावर ते कोलमडू नये म्हणून बांबूच्या काठ्यांचा किंवा सुतळीचा आधार द्यावा.
 
६. रोग व कीड नियंत्रण
मावा आणि थ्रिप्स : फुलांचा आणि पानांचा रस शोषतात. यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा डायमेथोएटची फवारणी करावी.
 
तांबेरा आणि काळा ठिपका रोग: पावसाळ्यात पानांवर डाग पडतात. यासाठी मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी करावी.
 
७. काढणी आणि उत्पादन
काढणी: लागवडीनंतर साधारण ३ ते ४ महिन्यांत फुले तयार होतात. फुले पूर्ण उमलण्यापूर्वी (अर्धी उमललेली असताना) सकाळी किंवा संध्याकाळी तोडावीत.
उत्पादन: चांगल्या व्यवस्थापनाखाली प्रति एकर ६ ते ८ टन फुलांचे उत्पादन मिळू शकते.
ALSO READ: पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी तिन्ही ऋतूंमध्ये करता येणारी झेंडूची शेती
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

विधान परिषदेच्या उपसभापतींच्या वरळी येथील निवासस्थानातून कोट्यवधी रुपयांची चोरी

पुढील लेख
Show comments