Marathi Biodata Maker

कागदाचे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का?

सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:17 IST)
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. जुन्या नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार असल्याने राज्यातल्या अनेक ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे या आरक्षणाला विरोध करत आहेत तसेच भुजबळ यांनी जालना आणि हिंगोली येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करून या सभांमधून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाकडून टीकादेखील केली. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि जरांगे यांच्यात मोठा वाद चालू आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याची टीकादेखील होऊ लागली आहे.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना रोखावे, अशी मागणी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. यावर अजित पवार म्हणाले, सर्वच नेत्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करू नये. तसेच एका बाजूला छगन भुजबळ हे मनोज जरांगेंविरोधात आक्रमक झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर कोणताही नेता त्यांच्याबरोबर उभा राहिलेला नाही. उलट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भुजबळांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेताना दिसत आहेत. त्यामुळे छगन भुजबळांना पक्षाने एकटे पाडल्याची चर्चा होत आहे.
छगन भुजबळ यांनी आज (सोमवारी)नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की,ओबीसी आंदोलनाच्या काळात तुम्हाला पक्षाने एकटं पाडले आहे का? कारण पक्षातील कोणताही नेता तुमच्या बाजूने बोलत नाही. यावर भुजबळ म्हणाले, अजित पवार त्या दिवशी म्हणाले, प्रत्येकाने जबाबदारीने बोलले पाहिजे. मी जबाबदारीनेच बोलतोय. भाषणांवेळी कागदी पुरावे दाखवतोय. हे कागद, हे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का? मुळात माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे तसेच माझा झुंडशाहीला विरोध आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: "देणगी द्या नाहीतर मंत्रिपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

दिल्लीतील साकेतमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचाव कार्य सुरु

शार्दुल ठाकूर मुंबईच्या टी२० लीगची धुरा सांभाळणार, संघाने त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली

महायुती सरकार २५ जूनपासून महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी राज्यव्यापी अभियान सुरू करणार

"देणगी द्या नाहीतर मंत्रीपदाचा राजीनामा द्या!" पार्थ पवार यांच्या अल्टिमेटममुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ

पुढील लेख
Show comments