Dharma Sangrah

सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप - मराठा क्रांती मोर्चा

बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (08:43 IST)
मराठा आरक्षणासाठी ०९ ऑगस्टपासून व्यापक जन आंदोलन केले जाणार आहे. महिला, मुलं, पाळीव जनावरांसोबत प्रत्येक गावात आंदोलन उभारले जाईल. काही दिवसात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असे मराठा क्रांती मोर्चाच्या लातुरात पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
 
राहीचंद्र मंगल कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला २२ जिल्ह्यातील समन्वय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकूण नऊ ठराव घेण्यात आले. मराठा आंदोलनाला सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप या बैठकीत करण्यात आला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शासनाला यापूर्वीच मागण्यांचे निवेदन दिले आहे. आता कसलीही चर्चा करायची नाही आणि कुणाचीही मध्यस्थी नको आहे, ०१ ऑगस्टपासून त्या त्या जिल्ह्यामध्ये मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, मराठा आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये द्यावेत, या कुटुंबातील सदस्यास सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, काकासाहेब शिंदे आणि तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकार्‍यांची एसआयटी चौकशी करावी, केवळ मराठा आरक्षणासाठी विधीडळाचे अधिवेशन बोलवावे, आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकार सोबत असहकार आंदोलन केले जईल, राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची या नंतरची बैठक परभणी येथे आयोजित केली जाईल असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

"त्यांनी माझा बाप काढला, आता निवडणूक लढवणारच!" – बंडखोर गोकुळ गीते यांचा महायुतीला थेट इशारा

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामना ६ जून रोजी सुरू होणार

LIVE: २७ जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे सावट; विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला

छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये धुमाकूळ घातल्यानंतर जंगली हत्तींचा कळप ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे सरकला; वन विभागाने अलर्ट जारी केला

पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची फसवणूक; ७०० नोकऱ्या गेल्या, रातोरात कंपनी बंद झाली

पुढील लेख
Show comments