Dharma Sangrah

नाफेडकडून पुढील आठवड्यापासून कांदा खरेदी सुरू होणार

Updated: बुधवार, 24 मे 2023 (21:12 IST)
 
मागील गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे.जिल्ह्यातील दहा बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक असून शेतकऱ्यांना हवा तसा बाजारभाव मात्र मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला कमीत कमी साडे तीनशे तर जास्तीत जास्त एक हजाराच्या आसपास भाव मिळत आहे.आज मितीस शेतकऱ्यांना सरासरी साडे सहाशे रुपये इतकाच भाव कांद्याला मिळत आहे. लागवडीसाठीचा खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.यातून जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  गोडसे यांची भेट घेत कांद्याला मोठी भाववाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गळ घातली होती.
 
खासदार हेमंत गोडसे यांनी पिंपळगाव येथील नाफेड कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी का मिळतो, शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी याविषयीचा आढावा खासदार हेमंत गोडसे यांनी नाफेडचे निखिल पठाडे यांच्याकडून घेतला. शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मिळणारा कमी भाव यापुढे काही दिवस मिळत गेला तर कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत नोटीस जातील अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या कांद्याला अधिकाधिक भाव मिळण्यासाठी नाफेड मार्फत तातडीने कांदा खरेदी सुरू करावी अशा सूचना वजा आदेश यावेळी खासदार गोडसे यांनी नाफेड प्रशासनाला दिल्या. नाफेड मार्फत नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीन लाख टन कांदा खरेदी होणार असून पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू करत असल्याची ग्वाही यावेळी नाफेडचे पठाडे यांनी दिल्या.
Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

पावसाच्या कमतरतेमुळे अकोलासह संपूर्ण विदर्भातील पिकांचे मोठे नुकसान! भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

माजी आयएएस अधिकारी यांनी घेतला गळफास

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार

ईस्ट झोनने दलीप ट्रॉफी २०२६ जिंकली; इशान किशनने १३ वर्षाची प्रतीक्षा संपवली

पुढील लेख
Show comments