suvichar

भारावून टाकणारा अभिनेता

सोमवार, 16 एप्रिल 2018 (12:57 IST)
प्रेक्षकांकडून दाद मिळणे, कौतुकाची पाठीवर थाप मिळणे, ही कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब असते. जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती पाहून भारावून जातात आणि त्या कलाकाराला त्याच्या कामाची खरी पावती देतात, त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करतात, तेव्हा रसिकांना 'माय बाप मानणार्‍या कलाकाराला सुध्दा त्याच्या कामाचं, कष्टाचं, चिज झाल्यासारखं वाटतं. अशीच एक घटना निखिल राऊत या अभिनेत्यासोबत घडली आहे. "चॅलेंज" या नाटकामध्ये तो 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांची भूमिका साकारत आहे.

या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक इतके भारावले कि, प्रयोगानंतर प्रेक्षकांनी निखिलला भेटून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या सोबतच या नाटकाने भारावलेल्या एका प्रेक्षकाने या नाटकाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि निखिलला आशिर्वाद म्हणून पैशांचे पाकीट दिले. निखिलला तर अनुभव अजून एका प्रयोगाला आला एका महिला प्रेक्षकांनी त्याला भेट वस्तू दिली आणि पाकिटात पैसे देखिल दिले निखिलने ते आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम व त्याच्या कामाची पावती समजून स्विकारले. काही सावरकर प्रेमी तर प्रयोगानंतर अक्षरश: निखिलच्या पाया पडतात. प्रेक्षकांच्या या प्रेमाविषयी निखिल सांगतो की, "कोणताही कलाकार हा आपली कलाकृती हि श्रद्धेने, मेहनतीने सादर करीत असतो. रंगभूमीची अगदी मनापासून आणि निष्ठेने सेवा करीत असतो, त्यावेळी रंगभूमीसुद्धा त्याला भरभरून देत असते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय, परंतु प्रयोगागणिक मिळणाऱ्या ह्या प्रेमामुळे खूप छान वाटतय. जबाबदारी वाढल्याची जाणीव देखिल होतीये."

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

Coconut Island in India भारतातील रहस्यमय 'कोकोनट आयर्लंड' नक्कीच भेट द्या

टीव्ही क्वीन' एकता कपूर वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहे, वडिलांच्या एका अटीने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले

पुढील लेख
Show comments