Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय संघ टी-20 मालिकेसाठी जाहीर

Updated: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017 (11:58 IST)
 
येत्या 7 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यापासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी राष्ट्रीय निवड समितीने आज भारतीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सलग चार अर्धशतके झळकावणाऱ्या अजिंक्‍य रहाणेला वगळून निवड समितीने आणखी एक धक्‍का दिला आहे. आजारी पत्नीच्या शुश्रूषेसाठी एकदिवसीय मालिकेतून सुटी घेतलेला सलामीवीर शिखर धवननेही टी-20 मालिकेसाठी संघात कम बॅक केले आहे.
 
प्रामुख्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करीत असलेल्या उमेश यादव व महंमद शमी यांनाही बाजूला ठेवण्यात आले असून गुणवान यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या ऐवजी अनुभवी आणि सध्या फॉर्ममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पाच प्रथमश्रेणी सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतने आपली कामगिरी सिद्ध करावी अशी निवड समितीची अपेक्षा आहे.
 
तब्बल 38 वर्षे वयाच्या आशिष नेहराची निवड अनेकांसाठी आश्‍चर्यकारक ठरली आहे. परंतु प्रचंड अनुभव आणि युवा खेळाडूंना त्याच्याकडून मिळणारे बहुमोल मार्गदर्शन यामुळे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये नेहराला मोठा मान आहे. नेहराने आतापर्यंत 25 टी-20 सामन्यांत सहभाग घेतला असून 34 बळी घेतले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण टी-20 मालिकेत नेहरा खेळला होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही त्याचा सहभाग निश्‍चित होता. परंतु दुखापतीमुळे त्याला बाजूला राहावे लागले. श्रीलंका आणि वेस्ट इंडीजविरुद्धचे सामने बिनमहत्त्वाचे असल्याने त्याला खेळविण्यात आले नव्हते, असे निवड समितीच्या सूत्रांनी सांगितले.
 
भारताचा टी-20 संघ-
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चाहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, आशिष नेहरा व दिनेश कार्तिक.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

बांगलादेशने आशिया कप आणि आशियाई खेळांसाठी संघाची घोषणा केली

रवींद्र जडेजा यांनी इतिहास रचला, चौथे अष्टपैलू खेळाडू ठरले

बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; भारताच्या WTC समीकरणावर काय परिणाम?

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर ९ गडी राखून पराभूत करत एक ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला

देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले

पुढील लेख
Show comments