Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताने श्रीलंकेवर एक डाव २३९ धावांनी विजय मिळविला

Updated: सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (15:26 IST)
 
तिसऱ्या दिवशी पहिला गडी गमावल्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकणं सुरु ठेवलं. श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कर्णधार दिनेश चंडीमलने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडले.
 
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. रविचंद्रन आश्विनने सर्वाधीक ४ बळी घेतले. त्याला उमेश यादव, इशांत शर्मा आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत चांगली साथ दिली. दरम्यान आश्विनने नागपूर कसोटीत कसोटी क्रिकेटमधला ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी कसोटी २ डिसेंबरपासून दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु होणार आहे. त्यामुळे या कसोटीत श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; भारताच्या WTC समीकरणावर काय परिणाम?

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर ९ गडी राखून पराभूत करत एक ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला

देवदत्त पडिक्कलने श्रीलंकेविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावले

ऋषभ पंत ॲडम गिलक्रिस्टला मागे टाकत कसोटी क्रिकेटमधील नंबर १ यष्टीरक्षक-फलंदाज बनले

First match of the Test series भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे

पुढील लेख
Show comments