Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरनेट

Updated: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (11:23 IST)
 
आजच्या काळात इंटरनेट इतके महत्त्वाचे साधन आहे की ह्याचा शिवाय जगणं अशक्यच झाले आहे. ह्याचा एक फायदा असा आहे की लोक घरातच बसून सर्व माहिती मिळवू शकतात. आज इंटरनेट शाळेत, ऑफिसात, कॉलेजात, रुग्णालयात, रेल्वे स्थानकात, शोध कार्यासाठी, बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. 
 
आपण घरातच बसून रेल्वेची, बसची, विमानाची, तिकिटे बुक करा शकता. तसेच शाळेच्या प्रकल्पासाठी मुलांना हे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंबापासून दूर राहणारे नातेवाईक किंवा सदस्य देखील या मुळे जवळ आलेली वाटतात. कुठल्या ही ठिकाणी जाण्याचा प्रोग्रॅम देखील बनवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमाने आपण आपल्यासाठी नोकरी शोधू शकतो. नवं घर देखील घरी बसल्या शोधू शकतो. इतकेच नव्हे तर आपला जोडीदार देखील याच्या वर शोधता येतो. 
 
या इंटरनेट चे जसे फायदे आहे तसे तोटे देखील आहे. लोक याचा गैर वापर करतात. तासंतास हे वापरतात. चांगल्या माहिती शिवाय नको ती माहिती मिळवून गैर वर्तन करतात. मुलं देखील अभ्यास सोडून तासंतास ह्याच्या वर गेम खेळतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर तसेच डोळ्यांवर देखील परिणाम होतो. कधी कधी या वर दिलेली माहिती खरीच असेल असे नसतं. काही लोक याच्या वरून लोकांची फसवणूक देखील करतात. पैशे लुबाडतात. या साठी योग्य असा सायबर कायदा असावा. म्हणून सावधगिरीने इंटरनेट हाताळावे आणि योग्य कामासाठीच त्याचा वापर करावे. हे असं जाळ आहे ज्यामध्ये माणूस गुरफटच जातो.इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित केलेले आहे. त्याला मर्यादेनेच वापरावे. आपण इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्यालाच आपले गुलाम करून ठेवावे नाही तर ते आपल्यासाठी नुकसानदायी होऊ शकतं.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

एआय पासून जागतिक बाजारपेठांपर्यंत, आकाश अंबानींनी जिओचा पुढील रोडमॅप उघड केला

शेफाली वर्माने महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण खेळाडू बनली

विवाह सोहळ्यादरम्यान आग लागल्याने किमान २२ जण जळून खाक

बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला: महानंदा एक्सप्रेसचे इंजिनसह तीन भाग रुळावरून घसरले

LIVE: मनोज जरांगे १२ सप्टेंबर रोजी मुंबईवर मोर्चा काढणार

पुढील लेख
Show comments