suvichar

वडगावची लढाई

First Anglo Maratha War वडगावची लढाई 12 -13  जानेवारी 1779 मध्ये महाराष्ट्रातील वडगाव मावळ येथे मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाली होती. हे युद्ध आधी अँग्लो-मराठा युद्ध म्हणून झाले होते.
 
मुंबई बंदरगाह 1661 पासून इंग्रेजांच्या अधिपत्याखाली होते. 18 व्या शतकाच्या दुसरा अर्ध्या भागात, मराठा साम्राज्याच्या उदयासह इंग्रजांना त्या बंदरगाह सुरक्षित करण्याची काळजी लागली. बासीन (वसई) येथून उत्तरेकडे आणि पुण्यापासून पूर्वीकडे, जे दोन्ही मराठा साम्राज्याचा भाग होते त्यांना ताब्यात घेऊन सुरक्षित व्हावं अशी गरज इंग्रेजांना वाटली. मराठ्यांनी फ्रेंच यांच्याशी बोलणी देखील सुरू केली होती, जी कुठेतरी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारताहून काढून बेदखल करण्याच्या प्रयत्नासाठी होती. ह्यामुळे इंग्रेजांना त्यांच्या प्रशासनाबद्दल आणखीन असुरक्षित वाटत होतं.
 
ह्या युद्धात रघुनाथराव, नाना फडणीसचे विरुद्ध पेशवाची गादीवर बसण्यासाठी इग्रेजांचे सहायक झाले. रघुनाथराव जे पेशवा होण्याचे दावेदार होते त्यांनी इंग्रेजांशी संधी केली ज्याच्या हिशोबानी रघुनाथराव पेशवे म्हणून बसवले जातील आणि त्या बदल्यात सालसेट आणि बस्सीन (वसई) किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देतील, असा करार करण्यात आला होता.
 
ही संधी 6 मार्च 1775 रोजी केली गेली ज्याला "सुरत ची संधी" किंवा "सुरतचे तह" देखील म्हणतात.
 
नोव्हेंबर 1778 मध्ये कॅप्टन जेम्स स्टीवर्ट आणि कर्नल एगर्टन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश सैन्याने मुंबईहून बोर घाटमार्गे पुण्याच्या दिशेने वाढणं सुरु केले. कर्नल एगर्टनने बेलापूर किल्ला ताब्यात घेतला आणि पनवेल येथे तळ स्थापन केला 22 नोव्हेंबर 1778 रोजी कॅप्टन स्टीवर्ट खंडाळ्याकडे निघाले.
 
इंग्रजांकडे 4,000 तोफखाना आणि बंदुकधारी सैन्य होते आणि त्यांच्यासोबत रघुनाथराव आणि त्यांच्या सैनिक आणि घोडदळाच्या छोट्या तुकड्या होत्या.
 
पनवेलहून कर्नल एगर्टन खोपोली पोहोचले आणि तिथे दुसरा ब्रिटिश तळ स्थापन केला. तोपर्यंत कॅप्टन जेम्स स्टीवर्ट खंडाळा गावात पोहोचले आणि त्यांनी घाटाच्या शीर्ष स्थानावर तळ स्थापित केला. कर्नल एगर्टन तिथे लवकरच पोहोचले आणि त्यांनी आपल्ंे सैन्याला दोन भागात, लेफ्टनंट कर्नल के आणि लेफ्टनंट कर्नल कॉकबर्न ह्यांच्यात विभाजित केले.
 
मुंबईहून सुरुवात करण्यापासून ह्यापर्यंत त्यांना मराठांनी काही नुकसान पोहोचवले नव्हते आणि त्याकारणे त्यांचा मनोबल खूप जड होता.
 
येथे जवळ -जवळ 10 हजार मराठांची फोज तयार होती ज्याचा नेतृत्व तुकोजीराव होळकर आणि सेनापती महादजी शिंदे हे करत होते. महादजीने इंग्रेजांच्या कूच मंद केला आणि पुरवठा पंक्ति  तोडण्यासाठी पश्चिमेकडे सैन्य पाठवले. त्यांना याची माहिती मिळताच इंग्रज तळेगाव येथे थांबले. नंतर मराठा घोडदळांनी शत्रूला सर्व बाजूंनी घेराबंद केला. त्यांनी इतर प्रकाराची रणनीतीचा उपयोग केला जसे गावे रिकामी करणे, अन्न-धान्य काढून टाकणे, शेतजमीन जाळणे आणि पाण्याचे बरा विषारी करणे.
 
इंग्रजांनी मध्यरात्री तळेगावातून माघे होण्यास सुरुवात केली, पण मराठ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून 12 जानेवारी 1779 रोजी ब्रिटीश सैन्याला घेरले होते, ज्याच्या फळस्वरूपात त्यांना वडगावात थांबावं लागलं. पुढच्या दिवस संपण्याधी इंग्रेज आत्मसमर्पणावर चर्चा करण्यास तयार होते.
 
16 जानेवारी, इंग्रेज आणि मराठांमध्ये 'वडगावची संधी' झाली, ज्याच्यानुसार 1773 पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे ऑफिसने ताब्यात घेतलेला सर्व मुलूख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
 
बंगालमधून पुण्याकडे कूच करणाऱ्या ब्रिटीश सैन्याला थांबवणे आणि भरुच जिल्ह्याच्या महसुलाचा वाटा करणे ह्याचे देखील करार यात होते.
 
इतिहासकार डॉ कर्नल (निवृत्त) अनिल आठले यांच्या मतानुसार, वडगाव मावळची विजयच्या मराठा अभिमानात विशेष स्थान आहे. ते म्हणतात, "भारतात इंग्रजांना चार वेळा जोरदार प्रतिकार झाला आणि वडगाव मावळची घटना ही एकमेव वेळ होती जेव्हा त्यांना आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करावी लागली आणि परतावं लागला."
 
2003 मध्ये 'एक्स्प्रेस नागरीक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठान' नावाच्या विजयस्तंभ वडगावच्या लढाईच्या स्मरणार्थ बनवण्यात आला. हा विजय आजही येथे दरवर्षी साजर करण्यात येतो.
 
- हर्षिता बारगल

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Father's day 2026 wishes from son in law in Marathi 2026 जावयाकडून सासऱ्यांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा

LIVE: मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी

प्रणित मोरे वाद प्रकरणी महाराष्ट्र सरकारची कठोर कारवाई, दिले हे आदेश

मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी, पोलीस आणि बीडीडीएस पथकांना सतर्क केले

कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये ५ वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments