Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मन शांत कसे ठेवायचे? गुरुदेव श्री श्री रविशंकर

Updated: सोमवार, 6 मे 2024 (21:22 IST)
 
नैराश्य का येते?
नैराश्याचे कारण म्हणजे आपली चेतना संकुचित झाली आहे. जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टी बोलता किंवा ऐकता तेव्हा त्यामुळे जीवनशक्तीचा ह्रास होतो. जेव्हा तुम्ही दु:खी असता तेव्हा आपल्या मेंदूचा मागचा भाग, ज्याला आपण हिप्पोकॅम्पस म्हणतो, आकुंचित होऊ लागतो. आपल्या मेंदूच्या मध्यभाग ज्याला अमगडाला म्हटले जाते तोही आकुंचन पावू लागतो. आणि जेव्हा अमगडाला संकुचित होऊ लागते तेव्हा आपल्या शरीराची ताकद कमी होऊ लागते.
 
लोकांना आत्महत्या का करावीशी वाटते?
समजा तुम्ही कोट घातला आहे आणि तो खूप घट्ट आहे. तेव्हा तुम्हाला वाटतं, 'अरे  ह्याला बाहेर काढा. त्यातून बाहेर पडा.' त्याचप्रमाणे, जेव्हा आपले सूक्ष्म शरीर किंवा प्राणमय कोश संकुचित होऊन आपल्या भौतिक शरीरापेक्षा लहान होतो आणि त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागते आणि मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात. पण आत्महत्या हा काही उपाय नाही.
 
आत्महत्येचा विचार मनात आल्यास काय करावे?
अशा स्थितीत गाणी म्हणा, प्राणायाम, ध्यान आणि अन्नाकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही नियमितपणे आसन, प्राणायाम आणि ध्यान कराल आणि सकारात्मक गोष्टींचा विचार कराल, तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचा प्राणमय कोश वाढत जाईल ; यामुळे तुमची उर्जा वाढेल आणि मग तुम्हाला आपोआप बरे वाटू लागेल. जेव्हा आपले ‘सूक्ष्म देह’ आपल्या ‘कारण शरीरा’पेक्षा मोठे होते; मग मजा येतो, आनंद वाढतो. त्यामुळे आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी प्राणशक्ती वाढवली पाहिजे. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी, मनाला उर्जा देण्यासाठी; जीवनशक्ती वाढवावी लागेल.
 
मनातून आसक्ती आणि द्वेष बाहेर कसे काढायचे ?
आसक्ती आणि तिरस्कारातून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे ‘तुमचे’ मन तुमच्यासाठी समस्या निर्माण करत आहे हे समजून घेणे. तुमचे ‘मन’ तुम्हाला त्रास देत आहे हे जाणून; तुमची 50% समस्या सोडवते. अनेकांना आपण स्वतःच्या मनाचा त्रास होतो हेही कळत नाही; ते जगाला दोष देत राहतात; जग त्यांना त्रास देत आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे उत्कटता आणि द्वेष आपोआप निर्माण होतो आणि नंतर नाहीसा होतो, तुम्ही फक्त त्याचे साक्षीदार असता.
 
तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही
जीवनातील मनाच्या समस्या टाळण्यासाठी, ज्ञानाच्या मार्गावर चालत राहा; योग वसिष्ठ वाचा, अष्टावक्र गीता वाचा; यामुळे तुमचे मन शांत होईल. पण तुम्ही दिवसभर फालतू बोलत राहिलो, टीका निंदा करत राहिलात तर तुमचे मन असेच भटकत राहील. त्यामुळे संघाला मोठे महत्त्व आहे. संघात, जेव्हा कोणी संन्यास बद्दल बोलत राहिल तेव्हा तुमच्यातही संन्यास चा गुण  निर्माण होईल, पण जर कोणी वासनेबद्दल बोलत राहिला तर वासना पकडते. ते रहस्यमयी  आहे.
 
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘तुम्ही अविनाशी आहात’ हे तुम्हाला माहीत आहे; तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही, मग तुमच्या मनाच काय आहे? ढग आकाशात घिरट्या घालू शकतात, पण ते आकाशाचे विघटन करू शकत नाहीत; हे अशक्य आहे ! खरी गोष्ट म्हणजे ढग आकाशाला स्पर्शही करू शकत नाहीत. हे समजल्यावर तुमचे मन शांत होईल
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा अंतरिम आदेश कायम ठेवला

रिक्षा - टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून अनिवार्य! सरकार कारवाई सुरू करणार

Gen Z यांच्या प्रेम आणि नातेसंबंधांवर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शब्द, 'सिच्युएशनशिप' ते 'सोलमेट'पर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?

पुढील लेख
Show comments