Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चुकीच्या खात्यात पैसे ट्रांसफर झाल्यास लगेच हे करा...

Updated: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (14:17 IST)
 
जसंच आपण पैसे ट्रांसफर केले तसेच संबंधित व्यक्तीकडून याबद्दल खात्री पटवून घ्या की त्याच्या खात्यात पैसे आले की नाही. जर त्याच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर आपण कोणत्या खात्यात पैसे ट्रांसफर केले आहे हे पुन्हा तपासून बघा. 
 
जर आपण चुकीच्या खात्यात पैसे ट्रांसफर केले असतील तर सर्वात आधी आपल्या बँकेला मेल करून घडलेल्या चुकीची माहिती द्या. बँकेला ट्रांजेक्शन संबंधित पूर्ण माहिती पुरवा. यात ट्रांजेक्शनची तारीख, वेळ, स्वत:चा अकाउंट नंबर आणि ज्या अकाउंट मध्ये चुकून पैसे ट्रांसफर झाले तो अकाउंट नंबर या सर्वांचा उल्लेख करा.
 
अशात अकाउंट नंबर चुकीचा असल्यास पैसे आपोआप खात्यात परत येतील. परंतू पैसे खात्यात आले नसतील तर ब्रांचमध्ये जाऊन ब्रांच मॅनेजरशी संपर्क करावा. पैसे कोणत्या खात्यात ट्रांसफर झाले हे माहीत करण्याचा प्रयत्न करा तसेच चुकीचं ट्रांजेक्शन आपल्याच बँकेच्या एखाद्या ब्रांचमध्ये झालं असल्यास पैसे आपल्या खात्यात सोप्या रित्या परत येतील. जर दुसर्‍या बँकेच्या खात्यात पैसे ट्रांसफर झाले असतील परत येण्यात अधिक वेळ लागू शकतो. 
 
अनेकदा बँकेच्या अशा प्रकरणात निकाल लागण्यात 2 महिने देखील लागून जातात. तथापि, आपण बँकेकडून कोणत्या शहराच्या कोणत्या ब्रांचच्या कोणत्या अकाउंटमध्ये पैसे ट्रांसफर झाले हे माहीत करू शकता. तसेच त्या ब्रांचमध्ये संपर्क साधून प्रयत्न करता येतील. 
 
आता प्रश्न येतो की पैसा ट्रांसफर झाल्यावर व्यक्तीने ते पैसे अकाउंटमधून काढून खर्च केले असतील तर काय? अशात बँक त्याच खातं तेवढे अमाउंटने लिन करेल आणि जसेच अकाउंटमध्ये पैसे येतील रक्कम आपल्या अकाउंटमध्ये ट्रांसफर करण्यात येईल.
 
RBI ने देखील बँकांना निर्देश दिले आहे की चुकीने पैसे दुसर्‍या खात्यात जमा झाल्यास बँकेने लवकरात लवकर पैसे परत करण्यासाठी प्रयत्न करावे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Yamaha R2 २७ तारखेला लाँच होणार यामाहाची दमदार बाईक ; १०,००० रुपयांत बुकिंग सुरू.

श्रीलंकेत क्रिकेट सामन्यादरम्यान पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद; प्रशिक्षकाचा मृत्यू

चमोलीतील बोगद्यात भूस्खलनामुळे ७ कामगारांचा मृत्यू; ३ जण अद्याप बेपत्ता, बचावकार्य सुरू

LIVE: नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व खटले मागे घेतले जाणार

पुढील लेख
Show comments