Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण भंडारी आणि नारायण दाभाडकर

Updated: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (13:39 IST)
 
कथेचा अर्थ एवढाच आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. वरवर साधा गुणी दिसणारा नारायण भंडारी मुळात सर्व टग्या आणि बिघडलेल्या मुलांचा लीडर असतो.
 
सध्या आपल्याकडे नारायण भंडारी प्रवृत्तीचं वर्चस्व आहे. ढोंगी लोकांना आपण त्यागी मानून बसलो आहोत म्हणूनच त्याग करणाऱ्या माणसांवर अन्याय होतोय. पतिव्रतेच्या गळयात धोंडा वेश्येला मणिहर अशी आपली परिस्थिती झाली आहे... नारायण भंडारीच्या या युगात नारायण दाभाडकरांचा त्याग कळणे केवळ अशक्य.
 
माझं आयुष्य जगून झालंय, त्या 40 वर्षाच्या तरुणाचं जगणं जास्त महत्वाचं आहे ही भावना राम-कृष्णाच्या परंपरेतून व संघ संस्कारातून आलेली आहे. 85 व्या वर्षी सुद्धा सहसा कुणाला स्वतःच्या प्राणापेक्षा अनोळखी माणसाचे प्राण वाचवण्याची बुद्धी होत नाही. प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो. पण मुळात ही भावना मनात निर्माण होते हेच किती दिव्य आहे. हा त्याग, हे समर्पण इथल्या मातीशी आपण एकनिष्ठ असल्याचं दर्शवतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार किती खोल रुजले आहेत हेच यातून दिसतं. संघाच्या शाखेवर काय शिकवलं जातं याच दर्शन या त्यागातून घडतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025 ला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. अश्या कितीतरी स्वयंसेवकांच्या त्यागातूनच संघाची ही वाटचाल झालेली आहे. 
 
आज स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या मंडळींनी दाभाडकर आजोबांच्या त्यागाची मस्करी केली, ते अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये भरती नव्हते इथपासून त्यांना मरण स्वीकारावं लागलं हा मोदींचा दोष आहे इथपर्यंत वाह्यात आणि नीच हा शब्द सुद्धा लाजेल इतक्या नीच पातळीवर टीका केलेली आहे.
 
इथे देशासाठी सर्वोत्तम त्याग करणाऱ्या सावरकरांवर गलिच्छ आरोप होतात, तर या गिधाड्यांपासून दाभाडकर आजोबा कसे वाचतील? मुळात या गिधाड्यांची बौद्धिक कुवत व सांस्कृतिक जडणघडण तेवढीच आहे. असे काही प्रसंग असतात जेव्हा राईट किंवा लेफ्ट अशी कोणतीच विंग क्षणासाठी का होईना नाहीशी होते. त्या प्रसंगापैकी एक म्हणजे नारायण दाभाडकर यांचा त्याग. पण जे लोक सैनिकांच्या कर्तृत्वावर संशय घेतात त्यांना ही बंधने लागू होत नसावीत. त्यांना हिसकावणे, ओरबाडने ही संस्कृती वाटत असल्यामुळे त्याग हा शब्द त्यांच्यासाठी तुच्छ असावा.
 
सावरकरांनी आत्मर्पण केलं त्याआधी ते म्हणाले होते की आता माझी कोणतीच इच्छा उरलेली नाही, मी माझं आयुष्य जगलेलो आहे, आता मला काही मिळवायचं सुद्धा नाही. मी सगळं काही मिळवलेलं आहे. सावरकरांनी प्रसन्न आणि संतुष्ट मनाने मर्त्यलोकाचा त्याग केला. दाभाडकर आजोबांसमोर सावरकरांचा आदर्श होता... 
 
म्हणून तर दाभाडकर आजोबांनी 40 वर्षाच्या तरुणासाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग केला आणि या मर्त्यलोकावरून निरोप घेतला... 
 
धन्योऽहम ! धन्योऽहम !
कर्तव्य मे न विद्यते किंची ।
धन्योऽहम ! धन्योऽहम !
प्राप्तत्यम सर्वमहा संपन्नम !
 
सावरकरांप्रमाणे दाभाडकर आजोबांची सुद्धा हीच भावना असेल.
 
आता ज्यांना यात टिंगल टवाळी करावीशी वाटते, टीका करावीशी वाटते त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, आपल्यात कोणतेच मानवी गुण नसल्यामुळे आपण पाशवी आहोत का याची खातरजमा करणे सुद्धा आवश्यक आहे. नारायण भंडारीच्या या युगात नारायण दाभाडकरांच्या त्यागाला किंमत नसेल. परंतु इतिहास कधीच दाभाडकरांचा त्याग विसरणार नाही. 
 
आम्ही सर्व तरुण मंडळी नारायण दाभाडकरांचे ऋणी आहोत... 
 
दाभाडकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि एक कडक सॅल्युट...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

वाराणसी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने पिस्तूलने गोळीबार, २ कर्मचारी जखमी

राज्य सरकारने एमएमआरडीएसाठी १२१ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्रात १२४ नवीन आरोग्य संस्थांचे उद्घाटन

नवीन एअर इंडिया इमारतीवर १०६ शहीदांची नावे दिसणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मंजुरी

पुढील लेख
Show comments