Marathi Biodata Maker

.........मोर..........

सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (10:58 IST)
आपला राष्ट्रीय पक्षी, हा काही मी मोरावर निबंध नाही लिहिणार आहे.पण मनात अचानक एक विचार चमकून गेला, की मोर म्हंटल्यावर कुठंतरी थुई थुई नाचणारा, रंगबिरंगी पिसारा असलेला, मनाला खुलवणारा मोरच डोळ्यासमोर येतो.
आपोआपच आपण ही रोमांचीत होतो, आंनदीत होतो. खरंच किती सामर्थ्य आहे न ह्याच्या असण्यात.
कविमनाचा तो सोबती आहे, बालगोपालांचा आवडता आहे, चित्रकाराची प्रेरणा आहे, नाचणार्याच्या आनंदाला उधाण आहे, प्रेमाची आर्त हाक आहे !
तर असं असावं न माणसाचं व्यक्तिमत्वही.असतात काही जण असे की त्यांची उपस्थिती ही आपल्या करता खूप असते, एक सकारात्मक जाणीव सतत अवतीभोवती असते, जगण्याची ऊमेद असते.
सर्वत्र आंनद पसरविण्याची क्षमता त्यांच्यात असते. मोर म्हटलं की खिन्न भाव कधीही मनास शिवत सुद्धा नाही, कुठंतरी काहीतरी विलोभनीय बघावयास मिळणार म्हणून खुश होतो आपण.
आणि म्हणून च राष्ट्रीय पक्षाचा मान ह्यास मिळाला असणार !! असं उगीचच मला वाटतं बर!
........म्हणून मनाचा पिसारा फुलवा आणि नाचा मनसोक्त "मोरा सारख" !! 
....अंगावर अलगद मोरपीस फिरविल्याचा आभास होऊन व्हा रोमांचीत.. ! 
.....ठेवा कुणाची आठवण म्हणून पुस्तकात मोरपीस अन द्या उजाळा त्या "क्षणांना"आठवून!
.......कित्ती सुंदर सुंदर गाणे आहेत मोरावर लिहिलेले ते गुंनगुणवुशी वाटतात न ! 
....आपली लाडकी पैठणी मोरशिवाय का पूर्ण वाटते आपल्याला, पदरावर मोर नसेल तर, ...हवी असते का अशी पैठणी आपल्याला?
....दारात एखादी मोराची सुंदर रांगोळी रेखाटली असली की, कित्ती बरं वाटतं न आपल्याला ! 
.....म्हणून तरआपली आपल्या बालपणापासून आपली आई मोराशी घट्ट मैत्री करविते, आणि शिकविते, "नाच रे मोरा ....."! होय न !! 
.....अश्विनी थत्ते. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसनिमित्त २२ ते २९ जुलै दरम्यान 'हरित महोत्सव' आयोजित करण्यात येणार

उद्धव ठाकरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २२ जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर दाखल होणार

दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीने २३ जुलै रोजी बंदची हाक दिली

पुढील लेख
Show comments