Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभ्यास करुन बेरोजगारीवर बोलावे

Updated: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (14:43 IST)
 
सार्या बाबींवर फक्त राजकारणीच कारणीभूत आहे अस नाही तर स्वत बेरोजगार तरुण ही तेवढाच कारणी भूत आहे ह्या सार्या परिस्थीतीला त्याच्या परिस्थितीला तोही जबाबदारच. आज काबील बनो सक्सेस अपने आप दोडकर आयेगा. हे कुणी लक्षात घेतल का? राहूल जी त्यांच्या भाषणात म्हणतात नोटाबंदी मुळे सर्वात जास्त बेरोजगारी आलीय. मग या आधी का तरुणाला लगेच नौकरी मिळत होती का? राहूल साहेबांनी उत्तर द्याव. बेरोजगार तरुण नक्षली होणार नाही याचा या आधीच्या आपल्या सरकार काय उपाय योजना केली होती. जो तरुण आज नक्षल होत आहे. ? राहूल गांधी नक्षल्यांच टार्गेटच बेरोजगार तरुणच नाही तर ज्याच्याजवळ पैसानाही गरीब आहे हाच व्यक्ती असतो. त्यालाच ते आमिष देवून त्यालाही कळत नाही तो नक्षली कधी झाला ते.
 
बेरोजगारी अजून एक कारण सांगता येईल ते म्हणजे पाहीजे तशी नौकरी मिळण्याच आट्टाहास. त्यापाई तरुण वर्ग कित्येक वर्ष खर्च करतो. आणि शेवटी काहीच हाती लागत नाही. अन बेरोजगारीच प्रमाण वाढत. mpsc,upsc देण वाईट नाही. पण त्यावरच वर्षं वर्ष अवलंबून राहन कितपत योग्य आहे?

तरुण वर्ग स्वतच्या व्यवसायाकडे कधी वळेल,शेती करायची लाज तरुण वर्गाला वाटायच काहीच कारण नाही. शिक्षण पद्धती कधी बदलेल.?
याआधी ह्या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीचा आपणास कितपत फायदा झालाय? हेही बघणे गरजेचे आहे.
प्राचीनकाळ ची गुरुकुल पद्धत किती योग्य होती हेही बघण गरजेच आहे. 
ह्यासार्या बाबींची पडताळणी करुण समीती बसवली गेली पाहीजे. योग्य ते शिक्षण दिल गेल पाहीजे. गुरुकुल पद्धत म्हणजे कोण कशात पारांगत आहे बघून त्याला आवश्यक तेवढच शिक्षण दिल गेल पाहीजे.कुठल्या क्षेत्रात किती रोजगार आहे हे बघूनच तेवढ्याना शिक्षण दिल पाहीजे. सर्वच कसे कामाला लागतील हे ठरवल पाहीजे. शेती किती लोकांनी करावी, शेती विशयक शिक्षण किती लोकांना द्याव, प्राथमिक शिक्षण सर्वांना कस मिळेल याच बरोबर व्यावसायीक शिक्षण कस जास्त तरुणांना देता येईल हे बघण गरजेच आहे.
 
आई वङील आज काल आईची वेगळी अपेक्षा तर वडीलांची वेगळी अपेक्षा असते, पाल्य तर त्याला तर भलत्याच गोष्टीत तो मग्न असतो मग अशाने कशी प्रगती होणार.पाल्य कशात हुशार आहे हे पालकांनी जाणून घेतल पाहीजे. तेच भविष्यात त्याकडून केल पाहीजे. आपल्या अपेक्षांचे ओझे पाल्याला का?
 
मी बरीच बेरोजगारीच कारण सांगितली आहेत. अजून ही काही कारण असु शकतील. राहूल गांधींना खर खुपच अभ्यासाची गरज आहे. फक्त मोदी टार्गेट न करता अभ्यास करुन बोलावे. बेरोजगारी त्यांनी स्वत कारण शोधावीत अन ती कशी सोडवू याकडे सरकारच लक्ष वेधल पाहीजे. सरकार चांगल काम करत असेल तर त्या प्रोत्साहन दिल पाहीजे. चुकत असेल ठऩकावून सांगीतल पाहीजे. पण आपण ठऩकावून सांगत असताना त्याचा पूर्ण अभ्यास असला पाहीजे. नाही तर आपल हसू होतच हे सार्यांना माहीत आहेच. आपण अभ्यास करुन बेरोजगारीवर बोलाल अपेक्षा करतो. धन्यवाद 
- विरेंद्र सोनवणे 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

एफडीएने नागपूरमधील परवानाधारक मेडिकल स्टोअरवर छापा टाकला

मुंबईत एका गाडीच्या बोनेटमध्ये सात फूट लांबीचा अजगर लपलेला आढळल्याने खळबळ

फातिमा सनाने शेफाली वर्माला केलेला हाताचा इशारा महागात पडला

LIVE: टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण

टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण, बीएमसी प्रस्ताव रद्द करण्याच्या तयारीत

पुढील लेख
Show comments