Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परप्रांतातील मराठी गुढी!

Updated: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:47 IST)
तिकडे विचारवतांमध्येही वैचारीक धुरळा उडाला आहे. आंदोलनातील हिंसाचार चुकीचा पण त्यातील मुद्दे बरोबर यापासून ते अगदी आजच्या कॉस्मोपॉलिटिन जगात अशा प्रकारचा प्रांतीयवाद जोपासणे चुकीचे अशा प्रतिक्रिया मराठी भाषकांकडूनच व्यक्त होत आहेत. त्याचवेळी हिंदी मीडीया तर या सगळ्या प्रकाराच्या विरोधातच आहे. हे सगळे होत असताना महाराष्ट्राबाहेर रहाणार्‍या मराठी भाषकांत मात्र बरीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील आंदोलनांचा आपल्यावरही काही परिणाम होईल, अशी भीतीही त्यांनी काही प्रमाणात वाटत आहे.

महाराष्ट्रात मराठी संस्कृती, भाषा टिकविण्याच्या बाबतीत वैचारीक आणि रस्त्यावरची आंदोलने होत असताना परप्रांतात रहाणार्‍या मराठी मंडळींची स्थिती काय आहे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे होते. बरीच वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही ही मंडळी 'मराठी' म्हणून उरली आहेत काय? मुख्य म्हणजे परप्रांतात, परभाषेच्या सावलीखाली राहूनही ते स्वतःची भाषा टिकवतात का? त्यांची पुढची पिढी मराठी बोलते का? मराठी सण, संस्कृती त्यांनी कितपत टिकवली आहे? आणि मुंबई व महाराष्ट्रात उसळलेल्या परप्रांतीयांविरोधातील आंदोलनाकडे ती कोणत्या नजरेने पहातात? त्याचवेळी परप्रांतीय म्हणून त्यांना स्वतःला काही त्रास झाला का? दुय्यमत्वाची वागणूक मिळाली का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न वेबदुनियाने केला. यासंदर्भात इंदूर, ग्वाल्हेर, बडोदा आणि हरिद्वार येथे रहाणार्‍या मराठी भाषकांना वेबदुनियाने लिहिते केले. त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी खालील दुव्यांवर टिचकी मारा. या विषयावर आपणही आपली मते खाली दिलेल्या चौकटीत व्यक्त करू शकता.

गंगेच्या काठावर मराठीचा मळा

माळव्यातील मराठी

शेठजीच्या राज्यातील मराठी

ग्वालियरचं मराठी जगत
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments