Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उन्हाळ्यात फायदेशीर बेलफळ ह्याचे 7 गुणधर्म जाणून घ्या

Updated: गुरूवार, 19 मे 2022 (07:58 IST)
 
1  उन्हाळ्यात उष्णमाघाताची भीती सर्वाधिक असते. बेलाचे सरबत पिण्याने उष्माघाताचा धोका होत नाही  आणि उष्माघात झाल्यास ते औषध म्हणून कार्य करते. शरीराची उष्णता दूर करण्यासाठी  हे खूप फायदेशीर आहे.
 
2 शरीरात उष्णता वाढल्यावर अ‍ॅमीबिक डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यातून मुक्त होण्यासाठी दररोज अर्धा कच्चा-पक्का  बेलफळांचे सेवन करा किंवा बेलाचे शरबत प्या . अतिसारामध्ये हे खूप फायदेशीर आहे.
 
3 उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोळे लाल होऊन त्यात जळजळ होते. अशा 
परिस्थितीत,  बेलाच्या पानांचा रस एक थेंब डोळ्यात टाकल्यास लगेचच फायदा होतो आणि कोणतीही हानी होत नाही. बेलाच्या पानाच्या रसात कचरा नसल्याचे सुनिश्चित करा. बेलाच्या पानांचा लगदा डोळ्यावर बांधल्याने डोळ्याच्या दुखण्यात आराम मिळतो. 
 
4 पचन संबंधी त्रासांमध्ये पिकलेल्या बेलफळाचे सेवन करणे फायदेशीर आहे. याचे सरबत प्यायल्याने पोट साफ होते.हे पाचक असण्यासह बलवर्धक आहे. वात-कफ संबंधित समस्या देखील याचा  वापर केल्यामुळे दूर होतात. जर गरोदर स्त्रियांना उन्हाळ्यात मळमळ होत असेल  तर दोन चमचे बेल आणि सुंठाचा काढा प्यायला दिल्याने फायदा होतो.  
 
5 बेलाचा मोरावळा शरीराचे सामर्थ्य वाढवते. अशक्तपणा दूर करतो.  
पोटाच्या समस्येमध्ये हे फायदेशीर आहे, बेलाचा लगदा खांडासह  खाल्ल्याने आतड्यांसंबंधी रोगात आराम मिळतो.
 
6 मुलांच्या पोटात जंत झाले असल्यास, बेलाच्या  पानांचा अर्क पाजणे हा एक प्रभावी उपाय आहे. एक चमचा पिकलेले बेल लहान मुलांना दररोज दिल्याने शरीराची हाडे मजबूत होतात.
 
7 बेलाच्या फळाला मध आणि खडीसाखरेसह चाटल्याने शरीराच्या रक्ताचा रंग स्वच्छ होतो. रक्तात देखील वाढ होते.याच्या गर मध्ये काळी मिरी,सेंधव मीठ मिसळून खाल्ल्याने आवाज सुमधुर होतो.  
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

कंडिशनर लावल्यानंतर केस गळतात? यामागची कारणे जाणून घ्या आणि केसांची अशी घ्या काळजी

कडुलिंबाचे पाणी मुरुमांपासून आराम देते; वापराची योग्य पद्धत येथे जाणून घ्या

मधुमेह असताना लोणचे, पापड आणि चटणी खाणे योग्य का?

लघु कथा : आणखी एक शेवटचा प्रयत्न! गोष्ट मूर्तिकाराची

रेस्टॉरंटसारखा तंदूरी गोबी टिक्का बनवा घरीच; लिहून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments