Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालंय, हे कसं ओळखाल?

Updated: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (15:37 IST)
भरपूर केस गळणं 
कागदासारख्या अखाद्या गोष्टी खाव्याश्या वाटणं 
तोंड येणं नखं खराब होणं 
सतत पाय हलवण्याची सवय असणं 

 रक्तक्षय होण्याची कारणं काय? 
अॅनिमिया म्हणजे रक्तक्षय होण्याची अनेक कारणं असू शकतात. यातलं मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात लोहाचं प्रमाण कमी असणं.
 
हे खनिज आपलं शरीर आपोआप तयार करू शकत नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी लोहयुक्त पदार्थ भरपूर खाण्याचा विचार करत असलात तर आपले शरीर सर्वप्रकारचे लोह ग्रहण करू शकत नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती हवे. 
 
लोह हे हेम आणि नॉन-हेम या दोन प्रकारचं असतं. हेम लोक लाल मांस, यकृत, अंडी, मासे यातून मिळतं आणि ते सहज पचवलं जाऊ शकतं.
 
याशिवाय गडद हिरव्या रंगाच्या भाज्या म्हणजे पालकासारख्या भाज्या आणि डाळींमध्येही लोह असतं. पण हे लोक नॉन हेम प्रकारातलं आहे.  
याचाच अर्थ भाज्यांतून मिळणारं लोह तुम्ही मोठ्या प्रमाणात पचवू शकत नाही.
 
त्याचप्रमाणे खनिजयुक्त ब्रेड, ब्रेकफास्ट सिरियल्स म्हणजे ओट्ससारख्या पदार्थांत लोह असतं पण ते पचवणं सहज शक्य नाही.  
 
कॉफी पिण्यापूर्वी थोडा विचार करा... 
तुम्ही काय खाता याबरोबर तुम्ही काय पित आहात याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही यातून किती प्रमाणात लोक मिळवत आहात हे पाहाणं गरजेचं आहे. 
 
याबद्दल बीबीसीने पोषणतज्ज्ञ पॉल शार्प यांच्याशी चर्चा केली. त्यांनी लंडनमधील किंग्ज कॉलेजमध्ये पचनक्रिया समजून घेण्यासाठी काही प्रयोग केले होते. 
 
अन्न पचवण्याच्या क्रियेत सहभाग घेणाऱ्या स्रावांचा परिणाम आणि आतड्याच्या कोशिकांमध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेला दाखवण्यात आलं.
आपलं शरीर किती लोह ग्रहण करू शकतं हे यातून समजून घ्यायचं होतं. जर तुम्ही नाश्त्याबरोबर संत्र्याचा रस घेतलात तर खाण्याऐवजी या पेयातून तुम्हाला जास्त लोह मिळेल, असं पॉल शार्प यांनी या प्रयोगात सांगितलं. 
 
संत्र्याच्या रसात सी व्हिटॅमिन असतं आणि त्यामुळे शरीरात लोह शोषून घेणं सोपं जातं.
 
पण तुम्ही नाश्त्याच्यावेळेस कॉफी घेतलीत तर कमी प्रमाणात लोह तुमच्या शरीरात शोषलं जाईल. 
 
तसं करायचंच असेल तर नाष्ट्यानंतर 30 मिनिटे थांबून कॉफी प्यावी. 
 
हिरव्या भाज्या 
लोहासाठी कोबी हासुद्धा एक चांगला स्रोत आहे. फक्त तो शिजवल्यामुळे, गरम केल्यामुळे त्यातलं लोह कमी होऊ शकतं हे लक्षात ठेवा.
 
संत्र्याप्रमाणेच कोबीमध्येही सी व्हिटॅमिन असतं. पण तुम्ही जेव्हा ही भाजी पाण्यात उकळता तेव्हा त्यातलं व्हिटॅमिन सी पाण्यात विरघळून जातं. त्यामुळे जर तुम्हाला पोषणमूल्यं हवी असतील तर ते कच्चं किंवा वाफवून खावे.
 
लोह आणि सी व्हिटॅमिन असणाऱ्या इतर भाज्याही अशाच प्रकारे खाव्यात. पण पालक याबाबतीत वेगळा आहे. उकळल्यामुळे पालक 55 टक्के अधिक वापरण्यायोग्य लोह स्रवतो असं शार्प सांगतात. 
 
“पालकातली ऑक्सेलेट लोहाला बांधून ठेवतात.” शार्प सांगतात, “आपण जेव्हा पालक उकळतो तेव्हा तो पाण्यात ऑक्सेलेट सोडतो आणि त्यामुळे लोह शोषलं जाण्याची शक्यता वाढते.” 
गव्हातलं फायटिक एसिट हे शरीरातलं लोह कमी प्रमाणात शोषलं जातं.
 
ज्या ब्रेडमध्ये यिस्ट तयार होत नाही असा ब्रेड चांगला समजला जातो.  
 
तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
 
कदाचित या थकव्यामागे काही दुसरं गंभीर कारण असू शकतं. सप्लीमेंट, गोळ्या घेण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरला जरूर विचारा कारण त्यांच्या अतिसेवनाचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
 
Published By- Priya Dixit 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

दररोज जेवणानंतर विड्याचे पान खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

जेवताना मुलाच्या हातात मोबाईल देता? आधी हे नक्की वाचा

जातक कथा : हत्ती आणि उंदीर; गोष्ट इवल्याश्या शक्तीची

रंगदेवतेला समर्पित असणार १० दिवसांचा 'सानंद नाट्यमहोत्सव'; ३ ऑगस्टपासून इंदूरमध्ये रंगणार २१ वी सानंद मराठी नाट्यस्पर्धा

चविष्ट, आरोग्यदायी आणि पौष्टिकही असे Honey and Orange Flavored Chicken

पुढील लेख
Show comments