Festival Posters

"Priority माणसांची"

'मला नाही जमणार ग ह्यावेळी', हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. काही वेळा ह्या वाक्यामागे खरं कारण असतं तर काही वेळा ती गोष्ट टाळायची म्हणून घेतलेला हा stance असतो. असं का होतं ह्याचा विचार केला तर लक्षात येते की आपल्या priorities ठरलेल्या असतात, त्यात जास्त फेरफार आपल्याला झेपत नाही.
 
माझी आई नेहेमी सांगायची की बाकी कशाला सवड काढ नाही तर काढू नको पण आपल्या सणावारांना, देवासमोर निवांत दिवा लावण्यासाठी, मुलांच्या शाळेतील शिक्षक पालक मीटिंगला, कुटुंबीयांच्या वाढदिवसाला, स्वतःच्या तब्येतीसाठी, मैत्रिणींबरोबर मज्जा करण्यासाठी, नक्की वेळ काढ.
 
मला काही सगळ पटायचं नाही. मी म्हणायचे, आई कामासाठी वेळ नको का? तर आई हसून सांगायची, महिन्याचा पगार मिळेल, बढती मिळेल म्हणून तू रोजच अगदी नेटाने काम करतेस ग पण नात्यांचे काय, आपल्या सांस्कृतिक विचारांचे काय? त्यासाठी वेळ काढावाच लागेल नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा एकटी घरात असशील तेव्हा कोण असणार आहे?
 
नातेवाईकांकडे कधी गेली नाहीस, मैत्रिणींना कधी घरी बोलावले नाहीस, स्वतः गेली नाहीस, मग तुझ्या उतरत्या काळात त्या येतील अशी अपेक्षा करु नकोस! आपण माणसे इतकी स्वार्थी असतो की काही न देता आपल्याला समोरच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाला तर वाईटही वाटते.
 
आईला म्हंटल तू एवढी psychology कधी शिकलीस ग? ती हसली आणि म्हणाली, आयुष्य जेवढं शिकवतं तेवढं तुमच्या एमबीए मध्ये पण नाही शिकवत.. तेव्हा माणसांना आधी priority दे तरच आयुष्यात सुखी आणि समाधानी राहशील.
 
- प्राजक्तं  

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पेड्डी'मधील जान्हवी कपूरच्या भूमिकेमुळे वाद निर्माण, दिग्दर्शकाने माफी मागितली

भयंकर! प्रसिद्ध अभिनेत्याचा खून

तो सीन संपला, पण....अभिनेत्री प्रिया बापटने कठीण काळात सहन कराव्या लागलेल्या अडचणींबद्दल खुलासा केला

CJP आंदोलनाला सेलिब्रिटींचा पाठिंबा! अतुल कुलकर्णींनी मागितली तरुणाईची माफी

पुढील लेख
Show comments