Dharma Sangrah

गजराज आणि मूषकराज

Updated: शनिवार, 21 नोव्हेंबर 2020 (14:23 IST)
 
उंदरांचे नशीब म्हणजे की त्यांनी वस्ती केल्यावर त्या नगराच्या बाहेर पाण्याच्या स्रोतांना पाझर फुटला आणि तिथे एक मोठा जलाशय बनला. त्या नगराच्या थोड्याच अंतरावर एक घनदाट अरण्य होतं. त्या अरण्यात असंख्य हत्ती राहत होते. गजराज हा त्यांचा राजा होता. तो प्रचंड मोठा होता. एकदा त्या अरण्यात पाण्याची कमतरता झाली. सर्वत्र वाळवंट झाले होते. प्राणी पाण्याच्या शोधात भरकटत होते. जड शरीर असलेल्या हत्तींची फार दुर्दशा होत असे.

हत्ती आणि त्यांची मुलं पाण्याअभावी किंचाळून मरत होते. गजराज हे सर्व बघून काळजीत पडला आणि काय करावं ह्याचा विचार करू लागला. 
 
एके दिवशी त्याच्या मित्र गरूडाने त्याला येऊन सांगितले की या नगराच्या दुसऱ्या बाजूस एक तलाव आहे आणि आपण तेथे जाणून आपली तहान भागवू शकता. हे ऐकताच गजराजने सर्वाना तिथे जाण्याचा सल्ला दिला. सगळे हत्ती त्या तलावाकडे जाऊ लागले. त्यांना ज्या वाटेतून जावं लागतं होत त्या वाटेत उंदराचे बीळ होते. दररोज ते हत्ती पाणी पिण्यासाठी तिथे यायचे आणि परत त्याच वाटेनी परतायचे. त्यांच्या नकळत त्यांच्या पायदळी हजारो उंदीर चिरडले गेले. असे बघून मूषकराजला काळजी वाटली. त्या उंदराच्या गटांमधून एका उंदराने त्याला सुचवले की आपण जाऊन गजराजशी बोला ते फार चांगले आहेत आपले म्हणणे ऐकतील. 

मूषकराज गजराजला जाऊन भेटतात आणि सर्व घडलेले सांगतात. सर्व ऐकून गजराजला फार वाईट वाटतं आणि तो नकळत केलेल्या कृत्याबद्दल त्याची माफी मागतो. मूषकराजला गजराज सांगतो की आम्ही आता तिथे येण्यासाठी वेगळा मार्ग शोधू. जेणे करून आमच्या मुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. या वर मूषकराज त्याचे आभार मानतो आणि आपण माझ्या सारख्या लहान प्राण्याचे म्हणणे ऐकून घेतले मी आपल्या कधीकाळी कामी येईन असे म्हणतो. गजराज विचार करतो की हा इवलुसा प्राणी माझ्या कसा कामी येईल. यावर गजराज स्मितहास्य करून मूषकराजाला निरोप देतो. 
 
काही दिवसा नंतर शेजारच्या राज्याच्या राजा आपल्या सैन्यात हत्ती समाविष्ट करण्याचा विचार करून अरण्यातून हत्ती पकडून आणण्याचे आदेश देतो. राजाजे सैनिक असंख्य हत्ती पकडतात. गजराज काळजीत पडून विचार करत करत फिरत असताना त्याचा पाय सैनिकांनी टाकलेल्या जाळयात पडतो आणि तो जाळ्यात अडकतो. जेवढे तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करायचा अजूनच तो त्या जाळ्यात गुरफटच जायचा. गजराज स्वतःला वाचविण्यासाठी मोठ्या-मोठ्याने ओरडतो. 
 
त्याचे ओरडणे ऐकून रानटी नर म्हैस जवळ येऊन त्याला काय मदत करू असे विचारतो. कारण त्या म्हैसला लहानपणी गजराजने वाचवले असते. त्यामुळे तो त्या गजराजाचे आदर करत असे. त्याला गजराज सांगतात की तू त्या नगराच्या जवळ उंदराचे बीळ आहेत तिथे जा आणि मूषकराजाला घेऊन ये. 
 
म्हैस द्रुतगतीने जातो आणि मूषकराजाला घडलेले सांगतो. मूषकराज आपल्या सह आपल्या सैन्याला घेऊन म्हशीच्या पाठी वर बसतो आणि गजराज कडे येऊन बघतो तर गजराजची स्थिती फार केविलवाणी झालेली असते. त्याला गजराजला बघून वाईट वाटत आणि तो आपण काळजी करू नका, मी आपल्याला यातून सोडवतो असे म्हणत आपल्या सैन्यासह जाळ कापण्यास सुरू करतो आणि गजराजला त्या जाळेतून सोडवतो. अशा प्रकारे उंदराने गजराजला दिलेले वचन पाळले आणि गजराज ची सुटका करून त्याचे प्राण वाचवले. गजराजला देखील इवल्याश्या जीवाची महत्ता कळते. ते दोघे आनंदात राहू लागतात.
 
 
बोध: परस्पर सामंजस्याने आणि प्रेमाने राहून एकमेकांचे त्रास दूर करून समस्यांवर मात देता येते.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Guru Purnima 2026 Wishes for Parents in Marathi आई-वडिलांसाठी गुरुपौर्णिमा शुभेच्छा

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima 2026 Naivedyam पारंपरिक, सात्त्विक आणि परिपूर्ण 'गुरुपौर्णिमा विशेष नैवेद्य थाळी'

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिले गुरु आई-वडिलांना शुभेच्छा द्या Guru Purnima 2026 Quotes In Marathi For Parents

Guru Purnima 2026 Speech Marathi गुरु पौर्णिमा भाषण मराठी, AI युगातही गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व

पुढील लेख
Show comments