Festival Posters

वसुबारस विशेष पारंपरिक पदार्थ-घरच्या घरी बनवा हे खास खाद्यपदार्थ

शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2025 (18:15 IST)
दिवाळीत साजरा केला जाणारा वसुबारस हा सण गायी आणि वासरांच्या पूजनासाठी साजरा केला जातो, तसेच या दिवशी तयार केले जाणारे पारंपरिक पदार्थ सात्त्विक, पौष्टिक आणि गायीच्या दुग्धजन्य पदार्थांवर आधारित असतात. हे पदार्थ गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पूजेचा भाग म्हणून नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. वसुबारसला तयार केले जाणारे काही विशेष पारंपरिक पदार्थ खालीलप्रमाणे.... 
 
बाजरीची भाकरी-या दिवशी बाजरीची भाकरी बनवून तिला तूप लावून नैवेद्यात ठेवतात. 
गवार शेंगांची भाजी- या दिवशी गावराच्या शेंगांची भज्जी केली जाते. साधी सोपी सात्विक अशी भाजी नैवेद्यात ठेवली जाते. 
दहीभात-दही आणि भाताचा साधा पण सात्त्विक पदार्थ, जो या दिवशी खूप लोकप्रिय आहे. याला साखर घालून खाल्ले जाते.
खीर-गायीच्या दुधापासून बनवलेली खीर हा वसुबारसचा प्रमुख गोड पदार्थ आहे. यात केशर, वेलची आणि सुकामेवा घालून ती अधिक स्वादिष्ट बनवली जाते.
बासुंदी-गायीच्या दुधापासून बनवलेली गोड बासुंदी हा महाराष्ट्रीयन पदार्थ वसुबारसला विशेषतः तयार केला जातो.
पुरणपोळी-गायीच्या तुपात बनवलेली पुरणपोळी हा महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे. चणाडाळ आणि गूळ यांचे मिश्रण असलेली ही पोळी गायीला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते.
लाडू-गायीच्या तुपात बनवलेले बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू किंवा नारळाचे लाडू या सणाला बनवले जातात.
ALSO READ: वसुबारसला गाई-वासराचे पूजन का केले जाते? कथा आणि महत्त्व जाणून घ्या
वसुबारसला बनवले जाणारे पदार्थ साधारणपणे सात्त्विक आणि शाकाहारी असतात, कारण हा सण गायीच्या पवित्रतेशी आणि सात्त्विकतेाशी जोडलेला आहे. तसेच काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: वसुबारस 2025 : गाई-वासराच्या पूजेचे सोपे मंत्र आणि आरती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: वसुबारसला दूध-दही खाण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या कारण

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या

सकाळची सुरुवात कशी करता? पहिल्या 10 मिनिटांतल्या सवयी ठरवतात तुमचे आरोग्य

नाते कमकुवत होत असल्याचे हे संकेत ओळखा; वेळेत घ्या योग्य निर्णय

लघु कथा : गोष्ट बुद्धिमान शेतकऱ्याची

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

पुढील लेख
Show comments