suvichar

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम ; पाणी कपातीची पालिकेची घोषणा

बुधवार, 2 मार्च 2022 (07:35 IST)
भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
 
मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात पतंजलीच्या दिव्या फार्मसीवर छापा, लाखो रुपयांची औषधे जप्त

वनतारा पुन्हा न्यायालयाच्या परीक्षेत यशस्वी, सर्वोच्च न्यायालयाने नवी याचिका फेटाळली

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

पुढील लेख
Show comments