Festival Posters

ठाण्यामध्ये 500 रुपयांसाठी एकाची हत्या

शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (16:46 IST)
ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका 28 वर्षीय भंगार विक्रेत्याला अटक केली आहे. त्याने तेच काम करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या केली आहे. व मृतदेह जाळून टाकला. भंगार विक्रेत्याने 500 रुपयांच्या उधारीसाठी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
 
पोलीस अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी गंगारामपाडा येथील सुरेश तारासिंग जाधव (वय 35) यांचा अर्धवट जळालेला मृतदेह वडपे गावच्या परिसरात आढळून आला होता. तसेच पोलिसांनी प्रथम अज्ञात लोकांविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर माहिती आणि पुराव्यांच्या आधारे गुन्हे शाखेने आरोपी बारकू मारुती पडवळे याला अटक केली आहे.
 
तसेच चौकशी केली असतात त्याने एका साथीदारासोबत मिळून जाधव यांचा खून केल्याचे उघड झाले. साथीदाराला अजून अटक करण्यात आलेली नाही. तिघेही भंगार विक्रेते म्हणून काम करायचे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार जाधव यांनी 500 रुपये उसने घेतले होते, ते वारंवार सांगूनही ते परत करत नव्हते.खुनाच्या दिवशी  जाधव यांना वडपे गावात नेऊन आरोपींनी पैशाची मागणी केली. कर्जावरून वाद वाढल्याने दोघांनी जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने वार केले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डस्टबिनमध्ये टाकून पेटवून दिला.अशी माहिती समोर आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीकडून २३ जुलै रोजी बंदची हाक

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी

मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसनिमित्त २२ ते २९ जुलै दरम्यान 'हरित महोत्सव' आयोजित करण्यात येणार

उद्धव ठाकरे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी २२ जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर दाखल होणार

दिल्लीतील आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रात भडकली, बहुजन वंचित आघाडीने २३ जुलै रोजी बंदची हाक दिली

पुढील लेख
Show comments