Dharma Sangrah

धारावी तरुण हत्याकांड प्रकरणात आणखी दोघांना अटक

Updated: बुधवार, 31 जुलै 2024 (18:06 IST)

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद वैश्य नावाच्या तरुणावर हल्ला करत काही जणांनी मारहाण केली. दोन गटातील भांडण्यात त्याने मध्यस्थी केल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी या  घटनेनंतर रविवारी गुन्हा दाखल केला आहे. आणि या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली. आम्ही या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे प्रकरण धारावीतील राजीव नगरचे आहे. दोन गटातील होणाऱ्या भांडणाला रोखण्याच्या प्रयत्न करणाऱ्या अरविंद वैश्य नावाच्या 26 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली आणि त्याची हत्या केली. अरविंदचा भावाच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास एका गटातील अल्लू नावाच्या तरुणाचे वाद दुसऱ्या गटातील सिद्धेश नावाच्या तरुणाशी झाले.  

अल्लू आणि त्याच्या गटातील काही लोकांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरु केले. मध्यस्थी करायला अरविंद वैश्य आला. रागाच्या भरात अल्लूने अरविंदला मारहाण केली. या बाबत तक्रार करण्यासाठी अरविंद धारावी पोलीस ठाण्यात गेला. त्याच्या पाठोपाठ अल्लूचे काही मित्र गेले आणि पोलिसांसमोर त्यांनी अरविंदला तक्रार परत घेण्यासाठी धमकावले.  

नंतर दोन पोलिसांसह अरविंदाला घटनास्थळी पाठवण्यात आले. तो तेथे आल्यावर अल्लूच्या गटातील काही लोकांनी पोलिसांसमोर त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. पोलिसांनी अल्लूला ताब्यात घेतले इतर पसार झाले. नंतर एकाला आणखी ताब्यात घेतले बाकीचे पसार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या अरविंदला तातडीनं रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आणखी आरोपींना अटक केली आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments