Marathi Biodata Maker

नाईट लाईफवरुन मुख्यमंत्र्यांचं टीकाकारांना उत्तर, तर बुलेट ट्रेनवरुन ठणकावलं

Updated: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (16:24 IST)
 
मराठवाडा काही वर्ष सतत दुष्काळाचा सामना करतो आहे. पाण्याचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या आहे. पंकजांनी हा मुद्दा ऐरणीवर आणला म्हणून धन्यवाद. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकार संवेदनशील आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पंकजा मुंडे यांचे आंदोलन सुरू होण्याआधीच सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
 
नाईट लाईफवर विरोधकांना उत्तर
नाईट लाईफच्या टीकाकारांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. नाईट लाईफ हे कष्टकऱ्यांसाठी आहे असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. नाईट लाईफचा अर्थ केवळ पब, बारपुरता संकुचित नाही असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ‘नाईट लाईफमध्ये लाईफ हा शब्द महत्त्वाचा आहे. मुंबई झोपत नाही म्हणतात. तर अशा कष्टकऱ्यांना जर त्यांना आवश्यक असलेलं जेवण उपलब्ध करुन द्यायच्या की नाही द्यायच्या. मुंबईकर घरी थकून येतो तेव्हा थकलेला असतो. पण जेव्हा तो बाहेर पडतो. तेव्हा सगळं बंद असतं. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी पोलीस २४ तास जागा असतो. पोलीस जागतात म्हणून आपण झोपतो. रात्रीच्या वेळेचा वापर चांगल्या कामासाठी होऊ शकतो. इतर सेवा सुरु असतात. रात्री पाळी असते. मग दुकानं का उघडी असू नयेत,’ असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
बुलेट ट्रेनवरुन टीका
बुलेट ट्रेनचा उपयोग खरंच कोणाला होणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  उद्योगधंद्याला खरंच चालना मिळणार आहे का याचा विचार व्हायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून ठणकावलं आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Ration Card Rules कुटुंबातील सदस्य स्वतंत्र शिधापत्रिका कधी मिळवू शकतात? अर्ज करण्यापूर्वी नियम जाणून घ्या..

नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई लाखमोलाचे संशयास्पद तेल जप्त

LIVE: मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात सप्टेंबरपासून केमोथेरपी वॉर्ड सुरू होणार

अमरावतीत महाराष्ट्र बंदचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा शांततेत निघाला

२०३० पर्यंत महाराष्ट्राला क्रमांक १ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आढावा

पुढील लेख
Show comments