Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिंदुत्वाबाबतचा 'तो' निर्णय चुकीचा : मनमोहन सिंग

Updated: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (12:29 IST)
 
दिवंगत कम्युनिस्ट नेते ए.बी. वर्धन स्मृती व्याख्यानालेत मनमोहन बोलत होते. न्यायाधीश वर्मा यांच्या निर्णयामुळे संविधानिक पवित्रतेला धक्का बसला आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यांच्या खंडपीठानेच त्यावर शिक्कामोर्तब केले होते, असे मनमोहन म्हणाले. वर्मा यांच्या निर्णयामुळे धर्मनिरपेक्षतेचे सिद्धांत आणि प्रथांबाबत राजकीय पक्षांमध्ये जी चर्चा होत होती, त्यावर परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे आपल्या राजकीय संवादाला असंतुलित करण्यात आले आहे. त्यामुळेच हा निर्णय बदलला गेला पाहिजे, असे अनेकांना वाटत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
 
न्यायाधीशांकडे कितीही सजगता असली आणि ते कितीही बुद्धिमान असले तरी संविधानिक व्यवस्थेचे केवळ न्यायपालिकेकडून संरक्षण केले जाऊ शकत नाही. संविधान आणि धर्मनिरपेक्षतेच्या संरक्षणाची जबाबदारी अंतितः राजकारणी, नागरी साज, धार्मिक नेते आणि प्रबुद्ध वर्गाचीच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments