अखिल भारतीय आखाडा परिषद ही सगळ्या आखाड्यांची प्रमुख संस्था आहे. या संस्थेची स्थापना आद्य शंकराचार्यांनी ८ व्या शतकात केली होती. याआधीही आखाडा परिषदेने देशातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. ज्यामध्ये आसाराम बापू, त्यांचा मुलगा नारायण साई, निर्मलबाबा, राधे माँ, रामपाल, गुरुमीत राम रहिम यांच्यासहीत १४ नावांचा समावेश होता. आता दुसऱ्या यादीद्वारे देशातील इतर भोंदू बाबांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.