रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने राजदचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह अन्य १५ जणांना २३ डिसेंबरला न्यायलयाने दोषी ठरवले होते. लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यांत कोषागारातून चारा खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप आहे.