Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच !

Updated: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:53 IST)
 
अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांवर भले मोठे कर्ज झाले होते. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांच्या पिकांना अद्याप भाव नाही. मध्यंतरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोंडअळी, मावा, तुडतुड्या या रोगांमुळे त्रस्त होता. सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत. कामगारांचे प्रश्नीही गंभीर झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगार कायदा धोक्यात आला असल्याची चिंता खा. शरद पवार यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवली होती. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे अनेक बडे उद्योगपती बँकांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज बुडवत परदेशी फरार होत आहेत. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी अशी कर्जबुडव्यांची मोठी यादीच आहे, मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे 'होय, मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचंच' असं जनतेने म्हणणे स्वभाविकच आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments