लोकशाही पध्दतीने हे मंत्री झाले आहेत परंतु त्यांची मानसिकता ही हुकुमशाही पध्दतीची असून त्यांनी केलेले वक्तव्य ही उघड धमकी देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे भारतीय दंड विधान कलम ५०६ अंतर्गत हा गुन्हा असून प्रशासनाची जबाबदारी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच अहिर यांना अटक करावी अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.