नंदर गावातील लोक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना दलित वस्तीमध्ये बोलवण्याची मागणी करत होते. याच मुद्द्यावरून स्थानिक लोक आणि अधिका-यांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतप्त लोकांनी दगडफेक केली होती. नंदर गावात अनेक विकासाची कामं प्रलंबित आहेत. त्यामुळे लोक नितीश कुमारांनी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी करत होते. परंतु नितीश कुमार नंदर गावातून निघून गेले आहेत.