मुस्लिम समाजापर्यंत पोहोचण्यासाठी २०१५ पासून संघाकडून अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशातील पश्चिम आणि दक्षिण भागातील मुस्लिमांपर्यंत पोहोचणे हे मुंबईत इफ्तार पार्टी आयोजित करण्यामागचे संघाचे उद्धिष्ठ असल्याचे सांगण्यात येते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे मोठ्याप्रमाणात वाणिज्य दुतावास आहेत. मुंबईत मोठ्याप्रमाणात मुस्लिम उद्योगपती राहतात. त्यांनी देशाच्या योगदानात मोठे योगदान दिले आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांशी चर्चा करू इच्छितो, असे पाचपोरे म्हणाले.