Dharma Sangrah

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस

कीटकनाशक फवारणीत शेतकऱ्यांच्या  झालेल्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. नोटीशीला सहा महिन्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. बंदी असलेले कीटकनाशक का वापरले जातात याविषयी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली आहे. 

कीटकनाशक कंपन्यांच्या निर्मितीवर आणि परवानग्यांवर सरकारचं नेमकं कोणतं नियंत्रण आहे, किंवा नाही, आणि नियंत्रण आणण्यासाठी काय केलं जाणार आहे. याविषयी ही विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

महाराष्ट्रात ३० ते ३२ शेतकऱ्यांच्या अतिविषारी किटकनाशकांची फवारणी केल्याने मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर ही बाब पुन्हा चर्चेला आली आहे. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या विषारी फवारणीचा फटका बसला आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments