Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

Updated: गुरूवार, 16 मे 2024 (14:57 IST)
 
स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण काय आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री पीए बिभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. दिल्लीच्या सीएम हाऊसमध्ये हा हल्ला झाला. त्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे. विभव कुमार आले तेव्हा त्या ड्रॉईंग रूममध्ये बसल्या होत्या. बोलत असताना त्यांच्यासोबत दुर्व्यव्हार करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू लागले. एवढेच नाही तर त्यांना अभद्रता करत मारहाणही केली.
 
स्वाती यांनी डायल 112 वर कॉल करून दिल्ली पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी त्या पोलिस ठाण्यातही गेल्या होत्या, मात्र त्यांनी तोंडी तक्रार दिली. लेखी तक्रार देते असे सांगून त्या निघून गेल्या. त्यानंतर हे प्रकरण खूप चर्चेत आहे. भाजप नेत्यांनीही याप्रश्नी निवेदने देऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान खासदार संजय सिंह यांनी निवेदन दिले की मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली असून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
 
पोलिस काय म्हणाले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार स्वाती मालीवाल यांनी केलेल्या कॉलबद्दल डीसीपी (उत्तर) मनोज मीणा यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, सकाळी 9.30 च्या सुमारास पीसीआरवर कॉल आला होता. कॉलरने स्वत:ची ओळख स्वाती मालीवाल म्हणून दिली आणि दिल्ली हाऊसमध्ये त्यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले. फोन येताच सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस पथक सीएम हाऊसमध्ये गेले, मात्र स्वाती मालीवाल तेथे आढळून आल्या नाहीत. पथक परत गेले, पण काही वेळाने स्वाती मालीवाल पोलिस ठाण्यात आल्या, मात्र त्यांनी या प्रकरणाची तोंडी माहिती दिली. नंतर लेखी तक्रार देते असे सांगून त्या निघून गेल्या.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments