या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की शेजारच्या आरती व भारत रसायन यांसह एकूण सहा कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या. बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की या कंपनीपासून तीन किमी अंतरापर्यंत असलेल्या इमारतींच्या घरांच्या काही काचा फुटल्या. तर
पालघर शहरासह जिल्ह्यातील उमरोळी, सातपाटी, केळवा व चिंचणी अनेक गावांमध्येही हादरे जाणवले. काही गावांमध्ये भूकंप झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या.