1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (09:32 IST)

काश्मीरबाबतचे चिदम्बरम यांचे व्यक्तव्य चुकीचे - नायडू

काश्मीर भारताने गमाविले आहे हे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी केलेले विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे केंद्रीय शहरी विकासमंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी येथे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तेलंगण भाजपने येथे एका सभेचे आयोजन केले होते, त्यात वैंकय्या नायडू बोलत होते.