Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाराणसीच्या घाटांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी आता शेणाच्या गोवऱ्या

Updated: मंगळवार, 19 सप्टेंबर 2017 (09:07 IST)
 
प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक लाकूड विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली असली तरी अनेक वेदिक पंडित, आणि पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले आहे. शेणाच्या गोवऱ्या वापरण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नसून लाकडाबरोबरच गोवऱ्याही वापरण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासूनच असल्याचे वाराणसीतील वेदाभ्यासक चंद्रमौली उपाध्याय म्हणतात. अंत्यविधीसाठी शेणाच्या गोवऱ्या वापरणे ही सनातन धर्माची परंपरा आहे असे ही ते म्हणतात.
 
काशी मोक्षदायिनी समितीच्या अहवालानुसार अंत्यविधीसाठी गोवऱ्या वापरण्याचा निर्णय घेणारे वाराणसी हे उत्तर प्रदेशातील पहिले स्थान असले तरी या पूर्वी नागपूर, जयपूर, रोहतक, जळगाव, इंदूर, रायपुर, कोलकाता, राउरकेला या शहरांमध्ये काही काळ आधीपासूनच लाकडाऐवजी गोवऱ्या वापरण्यात येत असल्याचे समजते. या नव्या पद्धतीमुळे झाडे तोडली जाणे कमी होऊन त्याशिवाय प्रदूषण ही कमी होईल असे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे.
आणखी एका अहवालानुसार वाराणसीमध्ये दर वर्षी साधारण 33 हजार शवांचे दहन केले जाते. त्यासाठी 16,000 टन लाकूड वापरले जाऊन त्यापासून सुमारे 800 टन राख तयार होत असते. गोवऱ्यांच्या वापराने यामध्ये घट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments