Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात : विजयाशांती

Updated: सोमवार, 11 मार्च 2019 (15:25 IST)
 
काँग्रेसच्या माजी खासदार राहिलेल्या विजयाशांती म्हणाल्या की, राहुल गांधी हे लोकशाही व्यवस्थेसाठी लढाई लढत आहेत तर मोदी हे एका हुकूशहासारखे काम करीत आहेत. मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीची हत्या करण्यात आली. लोकांना अडचणीत ढकलण्याचे काम मोदींनी केले आहे.  
 
पुढील पाच वर्षात ते हेच का करण्यासाठी निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु, लोक त्यांना ती संधी देणार नाहीत, असे विजयाशांती म्हणाल्या. आगाी लोकसभा निवडणुकीत राहुल आणि मोदी यांच्यातच खरी टक्कर होणार आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
 
देशात भाजपची सत्ता आल्यापासून प्रत्येक जण भीतीखाली जगत आहेत. दहशतवाद्यांना जसे लोक घाबरतात तशी भीती लोकांना मोदींची वाटत आहे. मोदी कधी कोणता बॉम्ब फोडतील, याचा नेम नाही. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम मोदी करीत आहेत.
 
पंतप्रधानांचे हे लक्ष्य असायला नाही पाहिजे. नोटाबंदी, जीएसटी, बँकेतील काळा पैसा, पुलवामा दहशतवादी हल्ला या सर्व मुद्दावरून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केल्याचा आरोप विजयाशांती यांनी केला आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments