suvichar

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून येण्याची 5 कारणं

Updated: बुधवार, 5 जून 2024 (18:51 IST)
अनेक दिवस टीव्हीवर रंगलेल्या या नाट्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाजूने सहानुभूती तयार झाली.
 
महत्त्वाचं म्हणजे ती सहानुभूती लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं.
 
2. भाजपच्याविरोधात गेलेलं वातावरण
उद्धव ठाकरेंना त्यांच्या बाजूने तयार झालेल्या सहानुभूतीचा वापर भाजपच्या विरोधात वातावरण तयार करण्यात करता आला.
 
हे दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेलं आक्रमण असल्याचं भासवण्यात त्यांना यश आलं. त्यात भर पडली ती भाजपनं अजित पवारांना हाताशी धरून पाडलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीची.
 
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मग भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं. त्यात त्यांना संजय राऊत, सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांची साथ मिळाली.
3. दलित, मुस्लिम मतदारांची एकजुट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला आणि त्यापाठोपाठ भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी विधानं यायला लागली. भाजप नेते अनंत हेगडेंनी संविधान बदलण्यासाठी 400 खासदार पाहिजे असल्याचं म्हणून एक प्रकारे विरोधकांच्या हातात आयतं कोलित दिलं.
 
काँग्रेससह सर्व विरोधकांनी हेगडेंच्या वक्तव्याचा आधार घेत भाजप सत्तेत आली तर संविधान बदललं जाऊ शकतं याचा प्रचार केला. राहुल गांधी तर त्यांच्या प्रत्येत रॅलीत संविधानाची प्रत घेऊन जायला लागले. त्याचा थेट परिणाम मुंबईत उद्धव ठाकरे यांनी जिंकलेल्या जागांमध्ये दिसून येतोय.
 
सीएएनंतर मुस्लीम मतदारांमध्ये भाजपच्या विरोधात एक प्रकारे हवा तयार झाली होती. त्यात मोदींच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यांची भर पडली आणि महाराष्ट्रातली मुस्लीम आणि दलित मतं महाविकास आघाडीकडे गेली. त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंना झालेला दिसून येतो.
 
4. काँग्रेस आणि शरद पवार गटाची मिळालेली साथ
अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना ही निवडणूक शक्य नव्हती.
त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघांवर नजर टाकली तर लक्षात येईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं थेट त्यांना ट्रान्सफर झाल्याचं दिसून आलं आहे.
 
शिवाय जागावाटपासारख्या कळीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांनी बऱ्याच अंशी सामजस्याची भूमिका घेतली. सांगलीच्या जागेवरून थोडी ताणाताण झाली, पण विशाल पाटील यांनी बंडखोरी करून काँग्रेसच्या बाजूने ती भरून काढली.
भाजपबरोबच्या युतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या जागा वाटपाची आणि फॉर्म्युलाच्या जेवढी चर्चा आतापर्यंत माध्यमांमध्ये झाली होती. तेवढी मात्र यावेळी झाली नाही.
 
5. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांनी केलेली कामगिरी
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळालेला कार्यकाळ अत्यंत नाजूक होता. त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातला साधारण दीड वर्षांचा कार्यकाळ कोव्हिड सारख्या महासाथीत गेला. त्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामांची अनेकांनी स्तुती केली.
 
कोव्हिडच्या काळात राबवलेला 'धारावी पॅटर्न' हा जगासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो असं उद्धव ठाकरेंनी या मॉडेलबद्दल म्हटले होते.
 
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी थेट लोकांशी कौंटुंबिक पातळीवर जाऊन संवाद साधला. या मुळे त्यांना प्रतिमा निर्मितीत चांगली मदत झाली.
 
त्यांची हीच कोव्हिड काळात तयार झालेली प्रतिमा, त्यात त्यांना आलेलं आजारपण, ऐन आजारपणात पक्षात पडलेली फूट, आजारपणात भाजपानं दगाबाजी केल्याचा त्यांचा प्रचार आणि लोकांची त्यांना मिळेली साथ ही त्यांच्या या यशाची खरी क्रोनोलॉजी म्हणता येईल.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

ज्येष्ठ गायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

LIVE: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, बच्चू कडू यांचा दावा

माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेने घरगुती हिंसाचाराचा एफआयआर दाखल केला

भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी… आदित्य ठाकरेंचा मोठा हल्ला

नागपूरमध्ये डेटिंग ॲप सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, कॅब चालकाला अटक

पुढील लेख
Show comments